शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

राखीव व्याघ्र क्षेत्राबाबत २०११ मध्येच निर्देश दिले; माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 1:04 PM

राज्यात त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते व मुख्यमंत्रिपदी दिगंबर कामत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करावे, असे निर्देश देणारे पत्र जयराम रमेश यांनी ते केंद्रीय पर्यावरणमंत्री असताना २८ जून २०११ रोजी राज्य सरकारला लिहिले होते.

राज्यात त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते व मुख्यमंत्रिपदी दिगंबर कामत होते. माजी केंद्रीय मंत्र्यांनी ही बाब आता उघड केली असून, हायकोर्टाच्या आदेशावरून राज्य सरकारला आता येत्या २४ पर्यंत म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्र जाहीर करावेच लागेल. त्याशिवाय पर्याय नाही, असे म्हटले आहे.

जयराम रमेश पुढे म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता चित्ता प्रकल्पाच्या बाबतीत श्रेय घेत आहेत, तसेच म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्राबाबतीतही घेतील; परंतु सरकार ही सलग चालणारी प्रक्रिया आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना मी राज्य सरकारला पत्र पाठवून निर्देश दिले होते, याची मुद्दामहून आठवण करून द्यावीशी वाटते.'

राज्य सरकार म्हादई अभयारण्य राखीव वेगळे क्षेत्र करण्याच्या विरोधात आहे. या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिले आहे. यापूर्वी २४ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला आदेश देताना तीन महिन्यांत म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करावे, असे बजावले. परंतु स्थानिक आमदार तथा वनमंत्री विश्वजित राणे व पर्येच्या आमदार दिव्या राणे यांचा या गोष्टीला विरोध आहे. अभयारण्यातील लोकांवर कठोर निर्बंध येतील व येथे काहीच करायला मिळणार नाही, तसेच मोठ्या संख्येने लोकांचे पुनर्वसन करावे लागणार असल्याने तेवढी जमीन उपलब्ध नाही, त्यामुळे राखीव व्याघ्र क्षेत्र नकोच, अशी भूमिका या दोघांनी घेतली आहे.

 

टॅग्स :goaगोवा