शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

दारुडे चालक नव्हे खुनी; बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 7:09 AM

गोव्यात वाहन अपघातांची संख्या कमी व्हावी म्हणून सरकार फार काही करत नाही, केवळ वरवरचे उपाय योजले जातात. 

गोव्यात असो किंवा महाराष्ट्रातील पुण्यात असो, दारुडे चालक खुनीच ठरू लागले आहेत. गोव्यात गेल्या वर्षभरात किंवा सहा महिन्यांत जे अपघात झाले, त्यापैकी काही वाहनांचे चालक मद्याच्या नशेत होते है कळून आलेच. परवा तर एका दारुड्या बसचालकाने चौघा निष्पाप मजुरांचा जीव घेतला. वेर्णा येथे रस्त्याकडेच्या झोपडीत झोपलेल्या मजुरांना त्याने चिरडले. यापूर्वी बाणस्तारी येथे झालेल्या वाहन अपघातात गोव्यातील धनाढ्य कुटुंबातील तरुणाने तिघांचे बळी घेतले होते. तोही दारूच्या नशेत होता. गोव्यात वाहन अपघातांची संख्या कमी व्हावी म्हणून सरकार फार काही करत नाही, केवळ वरवरचे उपाय योजले जातात. 

सरकार केवळ कोट्यवधी रुपये खर्च करून फेस्टिव्हल आणि सोहळे करण्यात धन्यता मानते. लोकांचे जीव सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचे राहिलेलेच नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल. सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक खाते व पोलिसांचा वाहतूक विभाग यांच्या सातत्याने बैठका होत नाहीत. वास्तविक या तिन्ही खात्यांच्या किंवा विभागांच्या नियमित बैठका व्हाव्यात, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी होती. मात्र मुख्यमंत्री निवडणूक प्रचार कामात बिझी राहिले. वाहतूकमंत्री माविन गुदिन्होही त्याच कामात व्यग्र होते. आता प्रचार नाही, पण पक्षकार्य संपलेले नाही. वाहतूक पोलिसांचा वापर हा केवळ गोव्याबाहेरील वाहने अडवून त्यांना तालांव देण्यासाठीच केला जात आहे.

बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग येते, मग धूळखात पडलेले अल्कोमीटर बाहेर काढले जातात. आता नव्याने मोहीम जरा सुरू झालेली आहे. गेल्या चार दिवसांत यंत्रणेने ७० मद्यपी चालकांना पकडले. काही ट्रक चालक, बसचालक किंवा कारचालक रात्रीच्यावेळी हमखास नशेत आढळतात. काहीजण दुपारीच ढोसून गाडी चालवतात, बसचालक दारुडा निघाला तर बसमधील सर्व प्रवाशांच्या जीवाशी तो खेळ ठरतो. २२ ते २५ मे या चार दिवसांत एकूण ४ हजार ८८५ वाहतूक नियमभंगाच्या केसेस नोंद झाल्या. सायंकाळी सहा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत ७० दारुडे चालक आढळून आले, त्यांना दंड ठोठावण्यात आला. 

वास्तविक अशी मोहीम सुरूच राहायला हवी. काल सायंकाळीच एक बातमी येऊन थडकली की फाझील फराश नावाच्या चालकाला म्हापसा न्यायालयाने दोन दिवस कारावास व साडेदहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीला कळंगुट पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात पकडले होते. अशाच प्रकारे दारुड्या चालकांना शिक्षा व्हायला हवी, असे गोमंतकीय म्हणतील. यापेक्षाही कडक शिक्षा झाली तर आणखीच चांगले ठरेल. स्वतः मद्य ढोसून गाडी चालवताना तो चालक स्वतःचा जीव धोक्यात घालतोच, पण दुसऱ्याचादेखील जीव घेत असतो. रस्त्याने जाणारे पादचारी, दुचाकीस्वार यांनाही असे चालक आपले वाहन ठोकतात. यापूर्वीही दारुड्या चालकांमुळे गोव्यात खूप अपघात झालेले आहेत. सरकारी यंत्रणेने कारवाई मोहीम सुरूच ठेवायला हवी. केवळ वाहतूक परवाना निलंबित करणे हा उपाय नव्हे, अपघातास कारण ठरणारे दारुडे चालक तुरुंगातच पोहोचायला हवेत. शिवाय ज्या मद्यपी चालकांमुळे दुसऱ्याचा जीव जातो, अशा चालकांवर खुनाचा गुन्हा नोंद व्हायला हवा. तो केवळ अपघात आहे असे मानले जाऊ नये.

गोव्यात अजूनदेखील अनेक दुचाकी चालक हेल्मेट न घालता वाहन चालवतात, हेही चिंताजनक आहे. गोव्यात गेल्या तीन महिन्यांत अनेक दुचाकीस्वारांचे बळी गेले आहेत. अर्थात, यात हेल्मेट घातलेले दुचाकी चालकही आहेत. वाईट वाटते की अवघ्या वीस-पंचवीस किंवा तीस-चाळीस वयोगटातील बाइक चालक रस्त्यावर मरण पावत आहेत. वाहनांची गर्दी असली तरी, भरधाव वेगाने अनेक दुचाकी चालक आपले वाहन पुढे नेतात. काही युवक तर प्रचंड वेगाने महामार्गावरून दुचाकी हाकतात. आई-वडिलांनी आपल्या लाडक्या कोवळ्या मुलांना दुचाकी घेऊन दिलेली असते. अलीकडे अतिवेगाच्या बाइक आलेल्या आहेत. २०१९ साली ६६ दुचाकीस्वार अपघातात मरण पावले. २०२० मध्ये ५२ तर २०२१ साली ४३ दुचाकी चालक ठार झाले. २०२२ मध्ये ६८ दुचाकीस्वार दगावले. केवळ चार वर्षात तीनशेहून अधिक दुचाकीस्वार ठार झाले. हे चित्र भयावह आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस