शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2024 12:59 PM

केंद्रीय कृषिमंत्र्यांचा 'संवाद' कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : नैसर्गिक, प्राकृतिक व समूह शेतीवर भर देऊन आधुनिक तंत्राचा वापर करून कृषी क्षेत्रात अनेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

साखळी येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ऑनलाइन पद्धतीने थेट संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. राज्यात कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याचा आमचा निर्धार असून केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या सूचना राज्यात तत्परतेने अंमलात आणून नवी क्रांती घडविण्यासाठी राज्य सरकार कार्यरत राहणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा मिशनअंतर्गत प्राकृतिक शेती व समूह शेतीवर भर देण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. नैसर्गिक शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देताना नवयुवकांना शेतीची आवड निर्माण करून कुठेही जमीन पडीक राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या थेट संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी, कृषी अधिकारी १९१ पंचायतींचे सरपंच, सदस्य, १४ पालिका व शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्वांना प्रेरणा दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत अंतर्गत शेती, शेतकरी, उत्पादन यावर विशेष भर दिला असून हा मंत्र आम्ही तातडीने अमलात आणून गोव्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी थेट संवाद साधताना कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे कौतुक केले. त्यांनी गोव्यात शेतीसंदर्भात केलेले प्रयोग देशातील इतर राज्यातही चालीस लावण्याची हमी दिली. यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती