शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दोन हेल्मेटच्या किमतीएवढा होतो दंड; गेल्या २ वर्षांत ५६ लाखांची वसुली, दहापट दंड वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 13:51 IST

गेल्या दोन वर्षांत हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांकडून ५६ लाख रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: राज्यातील विविध भागांत दररोज अपघात घडत असतात. या अपघातांपैकी जास्त घटना या दुचाकी वाहनांच्या अपघाताच्या असल्याचे दिसून येते. हेल्मेटचा वापर न केल्याने घडणाऱ्या या अपघातांतून कितीतरी जण गंभीर जखमी होत असतात किंवा अनेकांना त्यांचे प्राण गमावण्याची वेळसुद्धा येते. 

वाढत्या दुचाकी अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. या नियमांची पोलिसांकडून सक्तीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलिसांनी मोहीम सुरू केल्याचे दिसून येते. सक्तीची कारवाई सुरू असूनसुद्धा नियमांचे उल्लंघन करणारे दिसतात. ते पोलिसांच्या तावडीत नियमित सापडतात. अशांना दंड भरावा लागतो. सध्या विनाहेल्मेट प्रवासासाठी १ हजार रुपये दंड आकारला जात आहे. गेल्या वर्षभरात २६ हजारांहून जास्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

१००० रुपये भरा

एप्रिल २०२२ पासून दंडाची असलेली रक्कम १०० रुपयावरून १ हजार रुपये करण्यात आली. तेव्हापासून ते डिसेंबर २०२२ अखेर एकूण २०६३ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडाच्या रुपात २०.६३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. दंडाची रक्कम वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांकडून ५६ लाखांच्या दंडाची वसुली

गेल्या दोन वर्षांत हेल्मेटचा वापर न करणायांकडून ५६ लाख रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे. २०२१ साली दंडाची रक्कम २९.७८ लाख रुपये होती तर २०२२ साली २६.२१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

परवाना रद्दची शिफारस

दंडाची रक्कम वाढवल्यानंतर हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कडक पावले उचलताना परवाना रद्द करण्यात यावा, अशी शिफारस वाहतूक विभागाने वाहतूक खात्याला केली आहे.

पोलिसांना हेल्मेट सक्ती

सर्व पोलिस हेल्मेटचा वापर करीत असले तरी हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करताना स्वतः पोलिस हेल्मेटचा वापरतील याची खबरदारी घेतली आहे. तशी सक्ती केली आहे.

हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे

वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वत:ची सुरक्षा लक्षात घेऊन हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात असली तरी वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी विविध स्तरावर जागृती करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे. या संबंधीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. - तुषार लोटलीकर, वाहतूक निरीक्षक

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा