शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
7
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
8
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
9
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
10
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
11
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
12
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
13
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
14
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
15
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
16
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
17
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
18
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
19
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
20
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

आल्तीनो येथील चार घरे भर पावसात पाडण्यात आली, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

By समीर नाईक | Published: July 04, 2024 2:54 PM

सुमारे २००८ सालापासून या जागेच्या विषयावरुन न्यायालयीन घटला सुरु होता.

पणजी: आल्तिनो येथे श्री गणेश मंदिराच्या मागील भागात असलेली चार घरे पणजी महानगरपालिकेच्या मदतीने पाडण्यात आली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. एकूण ४ घरे पाडण्यात आली असून, दोन घरे बुधवारी पाडण्यात आली, तर उर्वरीत दोन घरे गुरुवारी पाडण्यात आली.

 सुमारे २००८ सालापासून या जागेच्या विषयावरुन न्यायालयीन घटला सुरु होता. भाटकारने हा खटला दाखल केला होता, अखेर निर्णय भाटकारच्या बाजूने लागल्याने उच्च न्यायालयाने घरे पाडण्याचा आदेश जारी केला होता. येथील कुटूंबियांना घर खाली करण्यासाठी आठवड्याभराची मुदतही देण्यात आली होती. मनपातर्फे एक घर मोडण्यामागे ५०,००० रुपये वसूल करण्यात येणार असल्याचे देखील या कुटूंबियांना कळविण्यात आले होते, पण पैसे जास्त होत असल्याने या कुटूंबियांनी स्वत:च आपली घरे पाडली.

गेली ४५ वर्षे ही चार कुटूंबीय येथे राहत होती, पण आता त्यांची घरे भर पावसात पाडण्यात येत असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. मनपाला या घरांनी कधीच घर कर भरलेला नाही, परंतु या घरांना विज व पाणी जोडणी मिळालेली होती. जर ही घरे बेकायदेशीर होती, तर या घरांना विज व पाणी जोडणी कशी मिळाली? याबाबतही चर्चा सुरु आहे. या घरातील एक युवक आताच पोलिस खात्यात भरती झाला आहे.

या बेघर झालेल्या कुटूंबियांनी आमदार बाबुश मोन्सेरात यांची भेट घेत याबाबत चर्चा केली होती, परंतु न्यायालयीन आदेश असल्याने मोन्सेरातही काहीच करु शकले नाही. तरीही बाबुश यांनी या कुटूंबियांना सर्वेापरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.