शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

Goa Election 2022: निकाल लागताच पाच मिनिटांत मुख्यमंत्री जाहीर करणार; गोवा काँग्रेसकडून स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 8:18 PM

Goa Election 2022: सन २०१७ च्या निवडणुकीतील इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काँग्रेस यावेळी दक्ष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : २०१७ साली मुख्यमंत्री कोण या शर्यतीत अडकून राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यास विलंब केलेल्या काँग्रेसला आता शहाणपणा आलेला आहे. निकाल लागताच पाच मिनिटांत मुख्यमंत्री कोण ते जाहीर करु आणि सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी दहा मिनिटांत राजभवनवर पोहोचू, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० पैकी १७ जागांवर विजय मिळाला. भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस सरकार स्थापनेसाठी दावा करु शकला नाही. कारण मुख्यमंत्रिपदाबाबत मतैक्य होत नव्हते. दिगंबर कामत, लुइझिन फालेरो, रवी नाईक, प्रतापसिंह राणे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. दिग्विजय सिंह हे तेव्हा काँग्रेसचे गोवा प्रभारी होते.

काँग्रेसला १७ जागा मिळाल्यानंतर अपक्ष रोहन खंवटे, प्रसाद गावकर यांनी पक्षाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. गोवा फॉरवर्ड व मगोपचे प्रत्येकी तीन आमदारही काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी अनुकूल होते. परंतु काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरेना आणि सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनवर पत्र पाठवण्यास काँग्रेसने विलंब केला. हीच संधी साधून भाजपने दिवंगत मनोहर पर्रीकर यांना केंद्रातून गोव्यात पाठवले आणि फॉरवर्ड व मगोप तसेच अपक्षाचा पाठिंबा मिळवत सरकार स्थापन केले. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काँग्रेस या वेळी दक्ष आहे. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस