शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Goa Election 2022 : "गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि माझे घर, मालकी हक्क योजना तृणमूल प्रभावीपणे राबविणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 18:47 IST

Goa Election : माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांची ग्वाही.

पणजी : गोव्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होताच ‘गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि माझे घर, मालकी हक्क’या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील, अशी ग्वाही माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी दिली. "राज्यात ‘टीएमसी’चे सरकार स्थापन होताच सर्व तिन्ही योजनांची अंमलबजावणी होईल," असं ते यावेळी म्हणाले. तृणमूल प्रवेशानंतर गोव्यात प्रथमच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सिन्हा केवळ या योजनांच्या व्यवहार्यतेबद्दलच बोलले नाहीत तर निधीच्या स्रोताबाबतही स्पष्ट केले आणि करदात्यांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नसल्याचे तसेच या योजना राबविण्यासाठी राज्याला आणखी कर्ज घ्यावे लागणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. सिन्हा म्हणाले, ‘या योजनांची संपूर्ण जबाबदारी मी घेतो आणि त्यांची अंमलबजावणी होईल, याची खात्री करून घेण्यासाठी तृणमूल सरकार सत्तेत आल्यानंतर मला तीन ते सहा महिने गोव्यात बसावे लागले तरी चालेल.’

अर्थमंत्री म्हणून आपला अनुभव मांडताना सिन्हा यांनी या तीन योजनांसाठी निधी कसा उभारला जाईल, हे विषद करून सांगितले. ते म्हणाले, ‘या तीन योजना मिळून सुमारे ३,३३० कोटी रुपये खर्च होतील. वित्त आयोग आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या निकषांच्या संदर्भात गोव्याकडे आधीच २,१०० कोटी रुपयांची अतिरिक्त वित्तीय तरतूद आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या बजेटमधून ही रक्कम या कल्याणकारी योजनांवर खर्च करता येईल.’

या योजनांसाठी पैसे काढू‘आम्ही सध्याच्या अर्थसंकल्पातून या योजनांसाठी पैसे काढू. त्यासाठी करदात्यांवर कोणतेही अतिरिक्त कर लावले जाणार नाहीत किंवा आम्ही या योजनांच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही अतिरिक्त कर्ज घेणार नाही. स्वतःचे घर कोणाला नको असते? तरुणांना २० लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. जेणेकरून ते स्टार्ट-अप किंवा त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात गुंतवणूक करू शकतील. महिलांना गृहलक्ष्मीच्या माध्यमातून पैसे हातात येतील,’ असंही त्यांनी नमूद केलं.

शाश्वत शेती, खाण यावर लक्ष केंद्रीत करूशाश्वत शेती आणि शाश्वत खाण व्यवसायावरही पक्ष लक्ष केंद्रीत करेल. जे दोन्ही गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे ते म्हणाले. ‘डबल इंजिन’ या शब्दावरून भाजपवर टीका करताना ते म्हणाले, ‘आज मोदी राज्य सरकारसंदर्भात दुहेरी इंजिनबद्दल बोलत आहेत, उद्या ते पंचायतींच्या संदर्भात तिहेरी इंजिनबद्दल बोलतील. हे कसे चालेल?’

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Yashwant Sinhaयशवंत सिन्हाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस