शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Goa Election 2022: “मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर सगळंच बदललं, भाजप सोडण्याशिवाय पर्यायच नव्हता”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 8:49 PM

Goa Election 2022: गोव्यातील भाजप सरकारची अनेक धोरणे, योजना आणि निर्णय चुकल्याचा दावा करण्यात आला आहे.

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर आता मतदानाकडे सर्वपक्षीयांसह राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोना संकटामुळे प्रचारसभांवरील निर्बंध वाढले आहेत. यातच गोव्यातील गड राखणे भाजपसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर बहुतांश गोष्टी बदलल्या. त्यामुळे भाजप सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही, असे मत भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये सामील झालेल्या एका बड्या नेत्याने व्यक्त केले आहे. 

एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मायकल लोबो यांनी आपली मते रोखठोक पद्धतीने व्यक्त केली आहेत. गोव्यातील भाजप सरकारची अनेक धोरणे, योजना आणि निर्णय चुकल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. 

भाजप सोडण्याचा निर्णय खूप पूर्वीच घेतला होता

माझ्यासाठी देश सर्वोपरि आहे. माझी पत्नी गेल्या १५ वर्षांपासून गोव्याच्या राजकारणात सक्रीय आहे. मात्र, भाजप सोडण्याचा निर्णय खूप पूर्वीच घेतला होता. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या. त्यामुळे भाजप सोडण्याशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही, असे सांगत कोळसा धुळीमुळे गोव्यात अनेकांचा मृत्यू झाला. पर्रिकर असताना ९ हजार टन कोळसा वाहतुकीसाठी परवानगी दिली नव्हती. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १२ हजार टन कोळसा वाहतुकीसाठी परवानगी दिली. भाजपचे पक्ष व्यवस्थापन फारच बदलले आणि ते मला अजिबात आवडले नाही. त्यामुळे अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे मायकल लोबो म्हणाले. 

दरम्यान, काँग्रेस सत्तेत आल्यास मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही काँग्रेसमध्ये सामील झालात का, यावर बोलताना मायकल लोबो म्हणाले की, आताच्या घडीला काँग्रेसमध्ये मी नवीन आहे. आधी पक्षासाठी काम करू इच्छितो. मुख्यमंत्रीपद हवे, असे आतातरी मनात काही नाही, असे मायकल लोबो यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस