शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Goa: गोव्यातील 'एकमेव संजीवनी सहकारी साखर कामगारांना सरकारचा दिलासा, इथेनॉल प्रकल्पात सामावून घेणार

By किशोर कुबल | Published: August 09, 2023 11:32 PM

Goa: कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

- किशोर कुबल पणजी  - गोव्यातील सहकार क्षेत्रात असलेल्या एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्याला 'मरणकळा' लागल्या असताना कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

रात्री उशिरा विधानसभेत कृषी, नागरी पुरवठा तसेच स्वतःकडे असलेल्या अन्य खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना नाईक  बोलत होते.ते म्हणाले की, 'जी कंपनी इथेनॉल प्रकल्प थाटणार आहे, त्या कंपनीला या कामगारांना सेवेत घ्यावे लागेल. कामगारांवर अन्याय होणार नाही.' मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की,'प्रकल्पासाठी दोन वेळा निविदा काढल्या परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढल्या जातील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात अन्य राज्यांमध्ये कुठेही मिळाला नाही एवढा भाव ऊसाला आम्ही दिला. प्रति तर ३ हजार रुपये दिले. शेतकऱ्यांची चिंता तसरकारला आहे.' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ,खाजन  जमिनींच्या बाबतीत ३६४ कोटी रुपये खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केलेला असून केंद्राच्या मंजुरीची आम्ही वाट पाहत आहोत. खाजन बांधांसंबंधी असलेले सर्व प्रश्न ही मंजुरी मिळाल्यानंतर मिटतील.'

विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना वेळेवर सबसिडी मिळत नाही, ऊस उत्पादनांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका केली. नागरी पुरवठा खात्याच्या अनुदान मागण्यांवर बोलताना विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी रेशनवरील तांदळाला लागलेल्या किडीचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की स्वस्त धान्य दुकानांमधून सरकारने चांगल्या दर्जाचा तांदूळ पुरवावा. स्वस्त धान्य दुकानांची वेळच्यावेळी तपासणी करावी तसेच तेथे कीटकनाशके फवारणी वगैरे गोष्टी हाती घ्याव्यात. सहा महिन्यात सर्व ११ गोदामे तीही ३.५ कोटी रुपयांमध्ये दुरुस्त करण्याचे जी भाषा सरकार करत आहेत ती दिशाभूल करणारी आहे. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी तांदूळ गहू तस्करीचे मोठे प्रकरण उघड झाले. परंतु नागरिक पुरवठा खात्याने काहीच कारवाई केलेली नाही.'

सरदेसाई यांनी स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची  तीन वेगवेगळी पाकिटे सभागृहासमोर ठेवली. एक पाकीट मुख्यमंत्र्यांनी, एक नागरी पुरवठा खात्याच्या मंत्र्यांनी आणि एक नागरी पुरवठा संचालकांनी न्यावे आणि तांदूळ शिजवून बघावा. तो किती निकृष्ट दर्जाचा आहे, हे दिसून येईल असे सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेgoaगोवा