शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
2
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
3
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 
4
जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?
5
Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा
6
वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?
7
हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..."
8
AUS vs IND: 'पुणे-मुंबई मार्गावर' मिळणार ऑस्ट्रेलियाचं तिकीट; Cheteshwar Pujara ही शर्यतीत
9
Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
10
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
11
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
12
Gulabrao Patil : "मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
13
गुरुपुष्यामृत योग: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय आवर्जून करा; गुरु-शनी शुभ करतील!
14
Baba Siddique Death News : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव
15
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
16
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा
17
Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?
18
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
19
Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
20
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 

भू-माफियाचे बांधकाम पाडले; जमीन बळकाव प्रकरणात पहिली धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 12:01 PM

मास्टरमाइंड पसार सिद्दिकीचे म्हापशातील बांधकाम जमीनदोस्त; कोणताही परवाना न घेता इमारतीची केली उभारणी

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी/म्हापसा : भू-बळकाव प्रकरणात पहिली धडक कारवाई काल, शुक्रवारी एकतानगर-म्हापसा येथे झाली. एसआयटीच्या तपासात मास्टरमाईंड म्हणून पुढे आलेला व सध्या पसार असलेला सिद्दिकी ऊर्फ सुलेमान मोहम्मद खान (४६) याने जमिनी बळकावून कोणतेही परवाने न घेता ही बांधकामे केली होती.

सुलेमान हा अनेक भू-बळकाव प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा आहे. एकतानगरमधील त्याची दोन घरे काल पालिकेने कडक पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. या कारवाईनंतर गोवा पोलिसांनी व्टीट करुन भू बळकाव प्रकरणात हवा असलेल्या सुलेमान याच्या या बेकायदा बांधकामांवर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांवरुन बुलडोझर घातल्याचे म्हटले आहे. एसआयटीच्या तपासात तो सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया करुनच ही बांधकामे पाडल्याचे म्हटले आहे.' दरम्यान, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या महिन्यात पालिकेकडून बांधकाम पाडण्याचा आदेश दिला होता. सदर बांधकाम पाडण्याची त्याला १५ दिवसांची मुदतही दिली होती. दिलेल्या मुदतीत बांधकाम पाडण्यात न आल्यामुळे पालिकेकडून ते जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईचा खर्च सुलेमानकडून वसूल केला जाणार आहे.

सदर जागेची पाहणी १ जानेवारी २०२२ साली पालिकेकडून करण्यात आलेली. त्यावेळी एकतानगरातील हाउसिंग बोर्ड परिसरात उभारण्यात आलेली बेकायदा बांधकामे आढळून आलेली. त्यानंतर त्या बांधकामांना पालिकेकडून कारणे नोटीस बजावण्यात आलेली. नोटिसीनंतर घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान सुलेमान योग्य कागदपत्रे सादर करण्यास अपयशी ठरला होता. सिद्दिकी याच्याविरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. हणजूण पोलिस स्थानकाच्या हद्दीतील त्याला एका खून प्रकरणात अटकही झाली होती. तसेच त्याच्या विरोधात बनावटगिरी तसेच फसवणुकीचे गुन्हेही नोंद आहेत.

सहा बांधकामे पाडली 

म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनुसार, एकूण सहा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. कारवाईपूर्वी सुलेमान याला नोटीस बजावण्यात आलेली; पण त्याला त्याच्याकडून प्रतिसाद देण्यात आला नाही. बांधकामासाठी लागणाऱ्या कोणत्याच प्रकारच्या परवानग्या त्याने मिळवल्या नव्हत्या. बांधकामे बेकायदेशीर होती. कारवाईसाठी जेसीबीचा वापर करण्यात आला होता.

९९ मालमत्ता जप्त

भू-बळकाव प्रकरणांमध्ये सरकारने एसआयटी स्थापन करून चौकशी केली. शिवाय हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांचा एक सदस्यीय 3 आयोगही नेमला. या आयोगाने सरकारला अहवाल सादर करुन काही शिफारशी तसेच सूचना केलेल्या आहेत. एसआयटी पोलिस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ५८ जणांना अटक केली. ६ सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ९९ मालमत्ता जप्त करण्यात आल्या. सरकारी जमिनी तसेच विदेशात स्थायिक झालेल्या लोकांच्या जमिनी बळवण्याचे प्रकार गेली काही वर्षे उघडपणे सुरु होते. या धडक कारवाईमुळे अशा प्रकारांना आळा बसला. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस