शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
3
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
4
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
5
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
6
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
7
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
8
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
10
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
11
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
13
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
14
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
15
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
16
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
17
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
18
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
19
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
20
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं

सरकारचा कार्यकाळ मध्यावर; मंत्र्यांच्या कामाचा आढावा हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 11:13 AM

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिले मंत्रिमंडळ बदलाचे संकेत, आता चतुर्थीनंतरच राज्यात होणार मोठ्या घडामोडी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बदलाचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत. सरकारचा कार्यकाळ मध्यावर आला की मंत्र्यांच्या कामाचा आढावा घ्यायलाच हवा व कोणताही सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचा आढावा घेतच असतो, असे सावंत म्हणाले.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक मंत्र्याची प्रशासनातील कामगिरी, त्याचा कामाचा वेग, खात्यांतर्गत कामगिरी, लोकांनी मंत्र्यांबद्दल नोंदवलेली मते आदी गोष्टी विचारात घेऊन पक्षाशी सल्लामसलत करूनच मंत्रिमंडळ फेररचना केली जाते. सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ मध्यावर आला की मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणे आवश्यक आहे. कारण, अडीच वर्षांनंतर निवडणुकीला सामोरे जायचे असते, असे सावंत म्हणाले.

सरकारमधील काही मंत्री वादग्रस्त बनले आहेत. या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, २०१२ पूर्वी आधीच्या . सरकारमध्ये मंत्री कसे होते हे जनतेने अनुभवले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात लूट चालली होती. कला अकादमी, स्मार्ट सिटी, राज्यभरात रस्त्यांची झालेली दुरवस्था, डॉगरफोड प्रकरणांबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने कामे हाती घेतली नसती तर हे प्रश्नच उद्भवले नसते. पणजी शहर स्मार्ट सिटी व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून निधी आणून कामे करण्यास सुरुवात केली. रस्ते खोदावे लागल्यामुळे लोकांना त्रास झाला, हे मान्य आहे; परंतु दरवर्षी पावसात शहर बुडत होते, तसे यंदा झाले नाही. दर्जेदार वीज मिळावी, यासाठी भूमिगत वीजवाहिन्या घालाव्याच लागणार त्यासाठी खोदकाम केल्यावर काही प्रमाणात त्रास होणारच, हे लक्षात घेतले पाहिजे. पूर्वीच्या सरकारने कामेच केली नाहीत म्हणून कोणाला त्रास झाले नाहीत. आता आम्ही कामे करत आहोत. त्यामुळे सर्वकाही मार्गी लागेपर्यंत लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

आरोग्य पर्यटनास सरकार प्रोत्साहन देत आहे. वेलनेस टुरिझमखाली १४ ते १५ हॉटेलांची नोंदणी झालेली आहे. गोव्यात स्वस्तात वैद्यकीय उपचारांची सोय झाल्यास विदेशातूनही पर्यटक येथे येऊ लागतील. मुख्यमंत्री एका प्रश्नावर म्हणाले की, मरीना प्रकल्प गरजेचा आहे. यामुळे येथे रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच शिवाय आखातात जहाजांवर नोकरीसाठी येथील अनुभव उपयोगी ठरेल. ते पुढे म्हणाले की, सीएम हेल्पलाइनचा लोक उपयोग करू लागले आहेत. आतापर्यंत २९० तक्रारी निकालात काढलेल्या आहेत.

...म्हणून मी बोलतो 

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काही मंत्र्यांची कामगिरी खराब झाली व मुख्यमंत्र्यांना अनेकदा हस्तक्षेप करावा लागला. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, मी कोणतीही फाइल माझ्याकडे आली की पूर्णपणे अभ्यास करून विषय समजून घेतो. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर उत्तर देणे मला सुलभ होते.

आम्ही कामे करतोय... 

सुरळीत वीज पुरवठा व्हावा, भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ते खोदले जात आहे. या कामांमुळे लोकांची गैरसोय होत आहे. मात्र पूर्वीच्या सरकारने कामेच केली नाहीत त्यामुळे कोणाला यापूर्वी त्रास सहन करावा लागला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निधीचा योग्य वापर करा

वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने तसेच वेळेवर व्हायला हवा. पंचायती, पालिका आदी स्थानिक स्वराज संस्थांनी निधी विनावापर ठेवू नये, यासाठी पावले उचलली आहेत. हा निधी बँकेत कायम ठेव म्हणून ठेवण्यासाठी नव्हे, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत