शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

राज्यासाठी तीन लहान धरणे, शंभर बंधारे आवश्यकः मंत्री सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 3:08 PM

लोक पाणी संवर्धनाबाबत गंभीर नसल्याचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात लोक पाण्याच्या संर्वधानाबाबत गंभीर दिसत नाही. आता जेव्हा वातावरणात बदल होत आहे, धरणे आटायला लागली, पाऊस उशीरा दाखल होत आहे अशावेळी पाणी मिळत नसल्यावर लोकांना जाग येते. राज्याला जर पुरेसे पाणी हवे असेल तर पावसाळी पाण्याच्या संर्वधनाशिवाय कुठलाच पर्याय नाही,' असे मत जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.

पावसाळ्यातील पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सरकारदेखील याबाबत खूप गंभीर आहे. भविष्यासाठी काही उपाययोजना सरकारने तयार केल्या आहेत. मुख्य म्हणजे धरणातून जेव्हा पाणी कालव्यात सोडण्यात येते आणि कालव्यांमधून जेव्हा पाणी शेतासाठी पुरवले जाते. यादरम्यान पाणी खूप वाया जाते. हे पाणी वाचविले तर यातून सुमारे ३० टक्के जास्त पाणी धरणात राहू शकते. पाणी वाया जाऊ नये यासाठी सरकार उपाययोजना करणार आहे', असे शिरोडकर यांनी सांगितले.

'गेल्या दहा वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. पर्यटन क्षेत्र वाढले, लोकसंख्या वाढली, अनेकजण शेतीकडे वळले आहेत. पाण्याचे मुख्य स्त्रोत नद्या, तळी दूषित होत आहेत. यातून पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे पाणी जर वाचवायचे असेल तर इतर काही गोष्टी नियंत्रणात येणे आवश्यक आहे. प्रदूषण करणाऱ्यांवरदेखील कारवाई होणे आवश्यक आहे,' असेही शिरोडकर यांनी सांगितले.

१०० बंधारे बांधण्याचे ध्येय 

'सध्याची पाण्याची गरज पाहता राज्यात आणखी तीन लहान धरणे आवश्यक आहेत. नद्यांवर १०० बंधारे देखील आवश्यक आहे. हे बांधण्याचे ध्येय मी ठेवले आहे. धरणांसाठी सुमारे १० ते १५ जागांची पाहणीदेखील करण्यात आली आहे. शिरोडा, काजूमळ व तातोडी ही तीन ठिकाणे जवळपास निश्चितही करण्यात आली आहेत,' असे शिरोडकर यांनी सांगितले.

लोकांनी विहीरी, तळे पुनरुज्जीवीत करावीत

'लोकांनी भविष्याचा विचार करत गरजेप्रमाणे जुन्या दूषित विहीरी, तळी साफ करुन पुनरुज्जीवीत करण्यावर भर द्यावा. आमच्या राज्यात अनेक नैसर्गिक जलस्त्रोत आहे, ते टिकवले तर बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न सुटेल, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

म्हादईचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल

'म्हादईचे पाणी वळविण्यात आले आहे, हे खरे आहे, यासाठीच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. आणि मला खात्री आहे निकाल आमच्या बाजूने लागेल. खरेतर पाणी वळविणे हा एक रोगाप्रमाणेच आहे. यातून पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. एकाचे पाहून दुसरे राज्यही असेच करेल. आपल्या भागातील पाण्याचा वापर करणे यात काही वाईट नाही. परंतु पाणी वळविणे चुकीचेच,' असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवा