शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

गोवा : पावसाचा धुमाकूळ सुरुच, घरांत शिरले पुराचे पाणी, शेतीबागायतींचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 3:02 PM

राज्यात गेला आठवडाभर धुवाधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पडत असलेल्या पावसाने  करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे.

नारायण गावस :

पणजी: राज्यात गेला आठवडाभर धुवाधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पडत असलेल्या पावसाने  करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे. लाेकांच्या  घरांच्या भिंती  कोसळल्या तसेच शेतीबागायतींचे नुकसात झाले. राज्यातील बहुतांश सर्व तालुक्यांना या  मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. 

पावसाचा धुमाकुळ सुरुच असून दीड महिन्यांत पाऊस शंभर पर्यंत पाेहचत आला आहे. आतापर्यंत एकूण ४१ टक्के पाऊस झाला. गेल्या २४ तासांत राज्यात ६.४ इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला असल्याने नर्सरी ते १२ वी पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 

राज्यातील धरणे ओव्हरफ्लो

मुसळधार पडत असलेल्या पावसाने राज्यातील बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तिळारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. तसेच अंजूणे धरण  ८९.४ मीटरपर्यंत भरले असल्याने  ९० मीटरची पातळी भरल्यावर  या धरणातूनही आज  पाणी  सोडण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे साळावली, चापोली आमठाणे  ही धरणेही १०० टक्के भरली आहेत.

पडझडीमुळे मोठे नुकसान 

राज्यात मुसळधार पावसामुळे माेठी पडझड झाली आहे. या वित्त हानीप्रमाणे जीवितहानीही झाली आहे.  काही लोकांच्या घरच्या भिंती पावसाने कोसळल्या. त्यामुळे लाखो रुपयाची हानी  झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या घरावर झाडे पडून मोठे नुकसान  झाले आहे. तसेच  रस्त्यावरील गाड्यावर झाडे पडून मोठे नुकसान झाले. काही लाेकांच्या  घरावर वीज खांब पाडल्याने वीज खंडित होण्याच्या मोठ्या घटना घडल्या. 

शेतीबागायतींची मोठी हानी

राज्यात पडत असलेल्या  मुसळधार पवसाचा जास्त फटका हा शेती बागायीतना बसला आहे. अनेक लोकांच्या शेती बागायती पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतीची मोठ्या प्रमाणात  नाशाडी झाली आहे. सत्तरी, बार्देश, पेडणे, काणकोण बहतांश सर्व  तालुक्यांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी  कृषी खात्याने याकडे लक्ष घालून नुकसान भरपाई देण्याची मागी केली आहे.

टॅग्स :goaगोवा