शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

Goa: अजूनही शांता आहोत.. दुर्गा पण बनू शकतो, ऐन नवरात्रात भोमच्या महिला कडाडल्या

By आप्पा बुवा | Published: October 22, 2023 11:24 PM

Goa: सरकारने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये अशा शब्दात भोम येथील महिलांनी ऐन नवरात्र मध्ये सरकारला इशारा दिला आहे.

- अप्पा बुवा  फोंडा - सरकारने दडपशाही चालवलेली असताना सुद्धा आम्ही अजून पर्यंत शांता  बनून राहिलो आहोत. परंतु ज्या तऱ्हेने सरकार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहे ते पाहता आम्ही दुर्गा पण होऊ शकतो. सरकारने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये अशा शब्दात भोम येथील महिलांनी ऐन नवरात्र मध्ये सरकारला इशारा दिला आहे.

रविवारी संध्याकाळी नागझरकर मंदिर परिसरात भोम येथील नागरिक गोळा झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश होता . पत्रकारांची बोलताना सर्व महिलांनी कोणत्याही परिस्थितीत गाव धोक्यात घालून प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेतला. प्रसंगी तीव्र लढा देण्याची तयारी सुद्धा ठेवण्याचा मनोदय बोलून दाखवला.

संपूर्ण आंदोलनाचे निमंत्रक संजय नाईक यावेळी बोलताना म्हणाले की सरकार नक्की काय लपवत आहे हे त्यांनी स्पष्ट येऊन लोकांना सांगावे. भोम संदर्भात सरकारची विविध खाती वेगवेगळी विधाने करत आहेत. काहीजण म्हणतात दोन घरे जाणार आहेत. काहीजण म्हणतात काहीच जाणार नाही. तर काहीजण आणखी काही वक्तव्य करत आहेत. एका बाजूने सरकार म्हणते की गाव देशोधडीला लागणार नाही तर दुसऱ्या बाजूने सरकारचे अधिकारी म्हणतात की जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. यामुळे इथले लोक खवळलेले असून सरकारने नक्की काय ते लोकांना समोर येऊन सांगावे. प्रशासन जोपर्यंत लोकांची समजूत काढत नाहीत व लोक प्रकल्पाविषयी समाधानी होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहोत. हे काम कसेच होऊ देणार नाही. ह्या बाबतीत आम्ही सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. तो आणखीन आठ दिवसात संपत आहे. ह्या आठ दिवसात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिक व अधिकाऱ्यांची भेट घडवून आणावी व लोकांना व्यवस्थित काय ते समजावून सांगावे.तसेच आतापर्यंत जो लपाछपीचा खेळ चालू आहे तो अगोदर बंद करावा.

स्थानिक आमदार गोविंद गावडे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की इथल्या आमदाराला लोकांचे काहीच पडून गेलेले नाही. त्यांचीच काही माणसे सदरच्या प्रकल्पावरून सरकारला मदत करत आहेत. ते वीस लोक कोण याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. योग्य वेळ येताच त्या 20 लोकांची नावे आम्ही जाहीर करू.  त्या वीस लोकांना गावाचे काहीच पडून गेले नाही. फक्त आपला व आपल्या राजकर्त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी ते भोळ्या बावड्या ग्रामस्थांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत.

चार दिवसांपूर्वी सरकारचे अधिकारी सर्वेक्षण करायला आले होते. तो मुद्दा घेऊन  ते म्हणाले की जर काहीच लपवायचे नाही तर मग सरकारी अधिकारी अपरात्री इथे येऊन  काम का करतात . ह्या बाबतीत स्थानिक पंचायत मंडळाला सुद्धा काहीच माहिती कसे नाही. सर्वेक्षणाला गावात येण्यापूर्वी निदान पंचायत मंडळाला तरी विश्वासात घ्या. यापुढे लोकांना न सांगता गावात सर्वेक्षण करायला आल्यास लोकांच्या सहनशक्तीचा उद्रेक होऊ शकतो. परवा जर काही अनुसूचित प्रकार घडला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती. आमच्या लोकांनी त्यावेळी संयम दाखवला. परंतु प्रत्येक वेळेस शेपटीवर पाय ठेवण्याचा प्रकार झाल्यास लोकांचा तोल ढळू शकतो हे सरकारने लक्षात घ्यावे.

आगामी ग्रामसभेत या विषयावरून आम्ही पंचायत मंडळाकडून ठोस काय ते जाणून घेणार आहोत. निदान त्यावेळी तरी पंचायत मंडळांनी ते गावाबरोबर आहेत की सरकार बरोबर आहेत हे स्पष्ट करावे. पंचायत मंडळातील काही पंच गावाबरोबर आहेत हे आम्हाला माहीत आहे. परंतु काही झारीतील शुक्राचार्य मात्र गावावर नांगर फिरवू पहात आहेत.

टॅग्स :goaगोवा