शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

गोव्याची किनारपट्टी सागरी लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावी - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Published: October 17, 2023 6:48 PM

गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

पणजी : गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. मुंबईत झालेल्या सागरी शिखर परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्हर्च्युअल पध्दतीने परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेस महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय जहाजोद्योग व बंदर तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय जहाजोद्योग व बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

मुंबईत एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेली ही शिखर परिषद पुढील तीन दिवस चालणार आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले कि,‘ नील क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांपासून खलाशांपर्यंत सर्वांचेच योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. जहाज बांधणीत मुख्यमंत्री म्हणाले कि, गोव्याचे मरिटाइम क्षेत्र आर्थिक विकासाभिमुख, नाविन्यपूर्ण व कनेक्टिव्हीटी देणारे आहे. जहाज बांधणीपासून दुरुस्ती, क्रुझ पर्यटन, सागरी प्रशिक्षण ते बंदराभिमुख औद्योगिकरण या सर्व बाबतीत राज्य सरकारचे योगदान महत्त्वाचे आहे. जगभरातील ३० हुन अधिक राष्ट्रांकडे गोव्यातील सागरी ‘गेट वे’ मुळे व्यापारी संबंध आलेले आहेत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ), नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ पोलार रीसर्च, नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ वॉटर स्पोर्टस आदी महत्त्वाच्या संस्था गोव्यात आहेत. अधिकाधिक आव्हाने पेलून मरिटाइम क्षेत्रात देशाचा विकास घडवून आणण्यासाठी आमच्याकडे पुरेशी यंत्रणा आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा शिपयार्डने जहाज बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तटरक्षक दल, मुरगांव बंदराला हे शिपयार्ड सहकार्य करीत आहे. जहाजांमधून येणाय्रा पर्यटकांची संख्या गोव्यात वाढत आहे. गोवा प्रमुख लॉजिस्टिक व क्रुझ टर्मिनल म्हणून उदयास येत आहे. केंद्रीय जहाजोद्योग व बंदर तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गोवा किनारपट्टी मल्टिमॅाडेल मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावे. फेरी सेवा, तरंगत्या जेटींमुळे राज्यात जलमार्ग कनेक्टिव्हिटी वाढणार असून त्यामुळे पर्यटनही बहरणार आहे.’ 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत