शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोव्यात सरकारी नारळ विक्री उद्यापासून, 15 ते 20 रुपयांचा दर निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 21:13 IST

सरकारी नारळ विक्री उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आज फातोर्डा व आल्तिनो पणजी अशा दोनच ठिकाणच्या प्रत्येकी एका दालनामधून नारळ विक्री होईल. पंधरा ते वीस रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

पणजी : सरकारी नारळ विक्री उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आज फातोर्डा व आल्तिनो पणजी अशा दोनच ठिकाणच्या प्रत्येकी एका दालनामधून नारळ विक्री होईल. पंधरा ते वीस रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

गोवा फलोत्पादन विकास महामंडळावर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कृषीमंत्री विजय सरदेसाई तसेच कृषी संचालक नेलसन फिगरेदो यांनी लोकमतला सांगितले की, येत्या पंधरा दिवसांत फलोत्पादन महामंडळाच्या सर्व दालनांमधून नारळ विक्री सुरू होईल. आज फक्त दोनच दालनांमध्ये नारळ विक्रीचा शुभारंभ होईल. आल्तिनो येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते तर फातोर्डा येथे मंत्री सरदेसाई यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

फिगरेदो यांनी सांगितले, की ठरलेल्या योजनेप्रमाणो सर्व दालनांमध्ये पुढील पंधरा दिवसांत नारळ विक्री सुरू होईल. नारळाच्या आकारानुसार तीन वेगवेगळ्य़ा प्रकारचे दर निश्चित करण्यात आले आहेत. पंधरा रुपये, अठरा रुपये व वीस रुपये असे तीन दर ठरविण्यात आले आहेत. एकदम मोठय़ा संख्येने नारळ उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आम्ही अंमलबजावणी करू. पंधरा दिवसांत सर्व टप्पे पूर्ण होतील. स्थानिक जे बागायतदार, विक्रेते वगैरे आहेत त्यांच्याकडून नारळ विकत घेतले जातील.

दरम्यान, काँग्रेसच्या महिला शाखेने बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. प्रत्येकी दहा रुपये दराने नारळाची विक्री व्हायला हवी, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या. सरकारने केवळ राजकीय स्टंट करू नये. नारळ विक्रीची सविस्तर योजना जाहीर करावी, असे कुतिन्हो म्हणाल्या. काँग्रेसच्या महिला शाखेने राज्यभर केलेल्या आंदोलनामुळेच सरकारला महागाईची व नारळाच्या वाढत्या दरांची दखल घ्यावी लागली. त्यामुळे आपण अनुदानित दराने नारळ विक्री करू अशी घोषणा सरकारने केली. जर सरकारने कमी दरात नारळ विक्री केली नाही तर पुढील वर्षभर महिला काँग्रेसची नारळ विक्री करण्याची तयारी आहे. आम्ही पंधरा हजार नारळांची अवघ्याच दिवसांत विक्री केली. लोकांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला व त्यामुळे भराभर नारळ विकले गेले, असे कुतिन्हो म्हणाल्या.

टॅग्स :goaगोवा