शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

सरकार भक्कम, सभापती बदलू; जुलैमध्ये अधिवेशन - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:50 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.

पणजी : आपल्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर आणि भक्कम आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. विधानसभेचे अधिवेशन येत्या जुलै महिन्यात घेतले जाईल. नव्या सभापतींचीही निवड करण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपने विधानसभेच्या चारपैकी तीन जागा जिंकल्या. आम्हाला यासाठी मंत्री गोविंद गावडे यांनी विशेष मदत केली. त्यांना आम्ही धन्यवाद देतो. शिवाय भाजपप्रणीत आघाडीचे अन्य घटक व आमचे अन्य सहकारीही भाजपसाठी वावरले. सर्वाचाच हातभार लागला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आता मंत्र्यांना अतिरिक्त खाती देणार काय असे पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की थोडा वेळ लागेल. विधानसभा अधिवेशन दि. 31 जुलैर्पयत आम्हाला घ्यावे लागेल. आघाडीच्या घटक पक्षांशी बोलून तारीख नंतर ठरवू पण जुलैमध्ये अधिवेशन होईल. भाजपच्या यशानंतर घटक पक्षाच्या सर्व मंत्री, आमदारांनी, अपक्षांनी आपल्याला फोन केला व आपले अभिनंदन केले. 

पणजी मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याने उत्पल र्पीकर यांनी आता पणजीत भाजपच्या कामात जास्त सहभागी व्हावे असे वाटते काय असे पत्रकारांनी विचारले असता, तेंडुलकर म्हणाले की तो निर्णय उत्पलनेच घ्यावा. पक्षाला जी भूमिका घ्यायची असेल ती भूमिका पक्षाकडून चर्चेअंती घेतली जाईल.

तो निर्णय सुदिनवरच दरम्यान, मगो पक्षाने अजून सरकारचा पाठींबा मागे घेणारे पत्र राज्यपालांना दिलेले नाही, त्याविषयी काय वाटते असे पत्रकारांनी विचारताच मुख्यमंत्री म्हणाले की त्याविषयीचा काय तो निर्णय सुदिन ढवळीकर यांनीच घ्यावा. ज्याने पाठींबा दिला होता, तोच पाठींबा मागे घ्यावा की घेऊ नये हे ठरवू शकतो. मगोपचा पाठींबा आमच्या सरकारला फक्त कागदावरच आहे. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा