शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

 सरकारचे आपत्ती व्यवस्थापन पडले उघडे; फेरीबोट ब्रेकडाऊन प्रकरणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

By किशोर कुबल | Published: June 26, 2024 2:38 PM

सरकारने गेल्या सहा वर्षात फेरीबोटींच्या देखभालीवर काहीच उपाययोजना केल्या नसल्याचा दावा त्यांनी केला.

किशोर कुबल/पणजी : बेती-पणजी फेरीबोट बंद पडल्यावरुन  विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हल्लाबोल केला असून सरकारचे आपत्ती व्यवस्थापन उघडे पडल्याची टीका केली आहे.

युरी म्हणाले की, 'इतिहासाची पुनरावृत्ती झाली.,सरकारने धडा घेतला नाही हे उघड झाले. जुलै २०२८ मध्ये बेती - पणजी जलमार्गावर "पिएदाद' फेरीबोट बंद पडली होती. मंगळवारी हीच फेरीबोट पुन्हा बंद पडली. महिलांसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे सरकारचे बचाव कार्य पाहून भाजप सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचा परत एकदा पर्दाफाश झाला.', असे युरी म्हणाले. चार तासांहून अधिक काळ अडकून पडलेल्या प्रवाशांची गैरसोय झाल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारने गेल्या सहा वर्षात फेरीबोटींच्या देखभालीवर काहीच उपाययोजना केल्या नसल्याचा दावा त्यांनी केला.

काँग्रेस सरकारच्या काळात खरेदी केलेल्या फेरीबोटी भाजप सरकार अजूनही चालवत आहे. या फेरीबोटी पूर्ण पारदर्शकता राखून खरेदी करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे आजतागायत कार्यरत आहेत. काँग्रेस सरकार नेहमी उत्पादनाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करते आणि म्हणूनच या सर्व फेरीबोटी चालवण्यास आजही योग्य आहेत. दुर्दैवाने सदर  फेरीबोटींची देखभाल करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप युरी यांनी केला.

सौर फेरीबोट “परवडणारी नाही” असा स्पष्ट शेरा बंदर कप्तानानी मारुनही भ्रष्ट भाजप सरकारने ती खरेदी केली, मात्र सदर फेरीबोटीच्या उद्घाटनाच्या एका वर्षाच्या आत नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सदर सौर फेरीबोट "परवडणारी" नसल्याचे मान्य केले, यावर युरी यांनी बोट ठेवले.

बेती-पणजी फेरीबोट बंद पडण्याच्या कालच्या घटनेने नदी परिवहन खाते  तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. काल पिएदाद फेरीवर अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी चोडण मार्गावरील  फेरीबोट आणण्यात आली होती. परिणामी चोडण-रायबंदर मार्गावर गोंधळ निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :goaगोवा