शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

“गोवा सरकार केंद्रातील भाजपचे गुलाम”; म्हादईसाठी आरजीची १०० किलोमीटर पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 3:54 PM

ठाणे सत्तरी ते उसगाव जागृती करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: म्हादईसाठी आता रिव्होल्युशनरी गोवन्सकडून (आरजी) १०० किलोमीटरची पदयात्रा काढली जाणार आहे. २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान ठाणे सत्तरी ते ऊसगाव अशी ही पदयात्रा होईल, अशी माहिती आरजीचे नेते मनोज परब यांनी दिली.

'कर्नाटक सरकारने कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने आपल्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरून या प्रकल्पांबाबत कर्नाटक सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, गोवा सरकार हे केंद्रातील भाजप सरकारचे गुलाम झाले आहे. त्यामुळे ते म्हादईबाबत हालचाल करीत नाहीत अशी टीका परब यांनी केली.

ते म्हणाले की, 'सत्तरी तालुका हा म्हादईच्या पात्रात येतो. या तालुक्यातील लोक, शेती, जनावरे, पर्यावरण या सर्व बाबी म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे तेथील लोकांमध्ये म्हादईबाबत जागृती करण्यासाठी ही पदयात्रा आयोजित केली आहे. यादरम्यान ठाणे सत्तरी ते ऊसगावअसे १०० किलोमीटर अंतर नऊ दिवसांत पार केले जाईल. दरदिवशी १० ते १२ किलोमीटर पदयात्रा संध्याकाळी ४:३० ते ८:३० अशी काढली. यावेळी लोकांना म्हादईचे महत्त्व पटवून दिले जाईल,' असे परब यांनी सांगितले.

पाणी टंचाईविषयी दाद मागणार : परब

सत्तरी, तसेच राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या भ आहे. त्यातच जर म्हादईचे पाणी वळवले, तर पाण्याची टंचाई अधिकच तीव्र होईल. अशा स्थितीत म्हादई वाचवण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. या पदयात्रेदरम्यान सत्तरी तालुक्यातील ज्या गावांना पाणी समस्या भासत आहे, त्या गावांतील समस्या मिटवावी, असे निवेदन तयार करून सार्वजनिक बांधकाम खाते, तसेच संबंधित खात्यांना सादर केले जाईल, असे परब यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा