शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

बेकायदा बांधकामांना वीज, पाणी जोडण्या कशा? हायकोर्टाचा सवाल, सरकारला कार्यवाही करायचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2024 07:38 IST

पंचायतींवर ठेवला ठपका, हायकोर्टाने राज्यातील सर्वच बेकायदा बांधकामांची तसेच अतिक्रमणांची चौकशी करण्याचा आदेश दिला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने घेतलेल्या स्वेच्छा याचिकेवर मंगळवारी सुनावणी सुरू झाली आहे. या बेकायदा बांधकामांना वीज जोडण्या आणि पाणी जोडण्या कशा काय मिळतात, असा प्रश्न न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती वाल्मीकी मिनेझिस यांच्या न्यायपीठाने केला.

मंगळवारी या प्रकरणात सुनावणी सुरू झाली, तेव्हा न्यायालयाने अशा बेकायदा वास्तूंना पाणीपुरवठा आणि वीजजोडण्या देण्याच्या बाबतीत माहिती विचारली. बेकायदेशीर इमारतींना वीजजोडण्या आणि पाणीपुरवठा कोणत्या आधारे दिल्या जातात. यामुळेच बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन मिळत असल्याचेही निरीक्षण नोंदविले. तसेच पंचायतराज कायद्यातील तरतुदींवरही चर्चा झाली आणि स्थानिक पंचायतींकडून पंचायतराज कायद्याचे पालन करून घेण्यास अपयश आल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. सरकारकडून याची दखल घेण्याची ही वेळ असून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जाव्यात, असेही सुनावले. मागील आठवड्यात बार्देशातील काही बेकायदा बांधकामे पाडली होती.

सर्व बेकायदा अतिक्रमणांची चौकशी करण्याचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती भारत देशपांडे यांच्या न्यायपीठाने १८ ऑक्टोबर रोजी चिखली येथील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांविषयी याचिकेवर सुनावणी घेत असताना राज्यातील सर्वच बेकायदा बांधकामांची तसेच अतिक्रमणांची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणात स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली जात असल्याचे जाहीर केले होते. अॅड. विठ्ठल नाईक हे य या प्रकरणात अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय