शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मी स्ट्राँग नेता म्हणून टार्गेट केले जातेय, तज्ज्ञांशी चर्चेने निर्णय घेऊ: मंत्री विश्वजित राणे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 07:27 IST

नगर विकास कायद्याच्या कलम १७(२) प्रकरणी एनजीओंनी केलेल्या निदर्शनांबाबत पत्रकारांनी विचारले असता विश्वजित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'मी स्ट्राँग नेता म्हणून मला टार्गेट केले जात आहे. आम्ही खरेतर राज्याच्या हिताच्याच गोष्टी करतोय,' असे नगर विकासमंत्री विश्वजित राणे यांनी एनजीओंच्या आंदोलनावर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 'ऊठसूट प्रत्येक विषयावर एनजीओ असे रस्त्यावर येत असतील तर त्यांनीच सरकार चालवू दे, आम्ही घरी बसतो,' असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.

नगर विकास कायद्याच्या कलम १७(२) प्रकरणी एनजीओंनी केलेल्या निदर्शनांबाबत पत्रकारांनी विचारले असता विश्वजित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "हायकोर्टाने दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यासाठी आमच्याकडे सहा आठवड्यांची मुदत आहे. आम्ही त्या अनुषंगाने विचारही करीत आहोत. सरकार तसेच कायदा तज्ज्ञांकडे सल्लामसलत करून व एकत्रपणे चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. कोणताही नेता स्ट्राँग असला की त्याला टार्गेट केले जाते. तसाच प्रकार माझ्या बाबतीत होत आहे."

ते म्हणाले की, "नगर नियोजन कायद्याचे कलम १७ (२) व ३९ (अ) ही दोन्ही कलमे राहतील. परंतु, याआधी झालेल्या भू रूपांतरणांबद्दल त्यांनी काही भाष्य केले नाही." दरम्यान, राखीव व्याघ्र क्षेत्राबाबत विचारले असता सोमवारपासून सुरू होणार असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबद्दलची मी दिलेली माहिती सभागृहाला मिळेल, असे विश्वजित राणे यांनी यावेळी सांगितले.

योग्यवेळी नावे जाहीर करू

विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी १७(२) कोणी जमिनी रूपांतरित केल्या, त्यांची नावे जाहीर करा, असे जे आव्हान दिले आहे, त्याबद्दल विचारले असता राणे म्हणाले की, "या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विधानसभा अधिवेशन हेच योग्य व्यासपीठ आहे. विरोधी पक्ष १७(२) बाबत ओरड करीत आहेत. परंतु, खरेतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही या कलमाचा लाभ घेतला आहे. त्यांची नावे मी योग्य वेळी विधानसभेत जाहीर करीन.

विरोधकांकडे मुद्देच नाहीत

मंत्री राणे म्हणाले की, "मला टीसीपीवरून तर मुख्यमंत्र्यांना खाजगी वनक्षेत्रावरून टार्गेट केले जात आहे. विरोधी पक्षांकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत. तामनार, रेल दुपदरीकरण आदी विकास प्रकल्पांना विरोध केला जात आहे. विरोधी पक्षात आमदार खूश नव्हते म्हणूनच ते आमच्याकडे आले." 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार