शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

इंडिया आघाडी राज्यात व देशात शेतकऱ्यांना भडकवते; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By वासुदेव.पागी | Updated: July 29, 2024 15:03 IST

आमदार निलेश काब्राल यांनी शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा शुन्यतासात लक्ष्यवेधी सूचनेद्वारे मांडला होता.

पणजीः शेतकऱ्यांना समजावून सांगण्या ऐवजी त्यांना भडकावण्याचे काम इंडिया आघाडी गोव्यात आणि देशातही क रीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले.

आमदार निलेश काब्राल यांनी शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा शुन्यतासात लक्ष्यवेधी सूचनेद्वारे मांडला होता. शेतकऱ्यांना पावसामुळे खूपच नुकसान झाले असून त्यात काकड्या, मिर्ची, भाजी, या सह इतर उत्पादकांची पिके नष्ट झाल्याचे निलेश काब्राल आणि इतर आमदारांनी सभागृहाच्या लक्षात आणून देण्यात आले.  दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आंतोन वाज यांनीही आपल्या मतदारसंघातही अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. खुद्द सभापती रमेश तवडकर यांनीही ही परिस्थिती सर्वत्र असल्याचे सांगितले.

त्यावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असे सांगितले. तसेच कृषी अधिकाऱ्यांना या संबंधी. पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. त्यावर युरी आलेमाव यांनी सांगितले की अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षाची नुकसान भरपाईच मिळाली नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षाची नुकसान भरपाई दोन दिवसात वितरीत करण्यात येणार असस्याचे सांगितले.

हे सांगतानाच त्यांनी आमदारांना उद्देशून सांगितले की विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना समजावून सांगावे. त्यांना भडकावू नये. इंडिया आघाडी गोव्यात आणि देशभर शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करीत आहे असेही ते म्हणाले. यावर विरोधकही खवळले विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी राहुल गांधी देशभर शेतकऱ्यांना भेटून तुमच्या सरकारमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. आपचे आमदार वेन्झी विएगशहनेही मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका केली,