शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

न्यायाधीश 'स्मार्ट' काम पाहणार, ३१ मेपर्यंत कामे झालीच पाहिजेत: उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2024 07:15 IST

धूळ प्रदूषण प्रकरणाची घेतली गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटीचे काम हे ३१ मेपर्यंत पूर्ण झालेच पाहिजे, असा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे. तसेच प्रकल्पाचे काम आणि शहरातील एकूणच परिस्थितीची सोमवार, दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता स्वतः न्यायाधीश पाहणी करणार आहेत. यामुळे इमेजीन पणजी स्मार्ट सिटी महामंडळ आणि पालिकेसह सरकारी यंत्रणांची धांदल उडाली आहे.

पणजीतील धूळ प्रदूषण प्रकरण बुधवारी सुनावणीस आले तेव्हा या प्रकरणात सरकारकडून सत्यस्थिती अहवाल सादर केल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिली. झालेल्या व राहिलेल्या कामाचा अहवालात उल्लेख आहे. स्मार्ट सिटीची एकूण ४७ पैकी ३५ कामे पूर्ण झाली असून केवळ १२ कामे राहिली असून ती कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही सरकारने पाळलीच पाहिजे, असे खंडपीठाने सुनावले.

१ एप्रिल रोजी न्यायाधीशांकडून कामाची पाहणी केली जाणार असल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले. राजधानीत पणजीत स्मार्ट सिटीच्या कामामुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणामुळे त्रस्त नागरिकांनी खंडपीठात सादर केलेली याचिका मंगळवारी सुनावणीस आली. त्यानंतर न्यायलायानेही याची गंभीर दखल घेतली आहे.

काम फसले

कंत्राटदाराविरोधात आम्ही पणजीचे पोलिस निरीक्षक व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र, कारवाई झाली नाही. आता पणजीवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच व्यावसायिकही या कामामुळे त्रासले असून प्रकल्पाचे काम फसल्याची टीका समील वळवईकर यांनी केली.

धूळ प्रदूषण डेटा घ्या

शहरातील धूळ प्रदूषणाची तपासणी करण्याची यंत्रणा त्वरित उभारण्यात यावी, असा आदेश खंडपीठाने मंगळवारीच दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी करणे चालू असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. तेव्हा आतापासूनच धूळ प्रदूषणाची मात्रा तपासणारा डेटा गोळा करण्यात यावा, असा आदेश गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला न्यायालयाने दिला.

डिमेलोही न्यायालयात

शहरातील या कामांमुळे एका २१ वर्षीय तरुणाचा अपघाती जीव गेला. त्यामुळे या प्रकल्पाच्या कंत्राटदाराला जबाबदार धरून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याचे निर्देश पणजी पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका तृणमूल काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केली आहे.

हा प्रकल्प शाप आहे

धुळ प्रदूषण यामुळे पणजी एखाद्या खाण क्षेत्राप्रमाणे भासत आहे. रस्ते वारंवार खोदले जात आहेत. ३१ मेपर्यंत काम संपविण्यासाठी दर्जाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या कामांचे ऑडिट व्हावे, अशी मागणी आपण केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहरासाठी वरदान नसून शाप ठरला आहे, अशी टीका माजी महापौर उदय मडकईकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटीHigh Courtउच्च न्यायालय