शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

मराठी, कोंकणीसह सर्व भाषांतून मिळणार निवाडे: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2024 08:31 IST

स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले ३७ हजार खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. भविष्यात मराठी व कोकणीबरोबर देशातील अन्य भाषांमध्येही या निवाड्यांचे भाषांतर केले जाईल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले ३७ हजार खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. भविष्यात मराठी व कोकणीबरोबर देशातील अन्य भाषांमध्येही या निवाड्यांचे भाषांतर केले जाईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले. 

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या 'ट्रेडिशनल ट्रीज ऑफ इंडिया' या पुस्तकाचे दोनापावला येथील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये सरन्यायाधीशांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. न्यायालयाने दिलेले निवाडे स्थानिक भाषा जसे मराठी, कोकणी, तमीळ, मल्ल्याळम अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले तर लोकांना हे निवाडे समजणे सोपे होते. न्यायालये कशी काम करतात याची माहिती त्यांना मिळेल. यासाठीच स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने ३७ हजार निवाड्यांचे हिंदी भाषेत भाषांतर केल्याचे त्यांनी सांगितले.

भावी पिढीसाठी निसर्ग, पर्यावरण, झाडे जपणे, त्यांचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. निसर्गाशी माणसाचे नाते अतूट आहे. त्यामुळे त्याचा आदर करावा, जर त्याचा अवमान केला तर वादळ तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने निसर्ग आपल्याला धडा शिकवतो, याची यापूर्वीही काही उदाहरणे दिसून आली आहेत. राज्यपालांनी लिहिलेल्या पुस्तकात झाडांचे मोठे महत्त्व दिले आहे. झाडाला केवळ पर्यावरणातच महत्त्व नसून ते पक्षी, किटकांनादेखील आश्रय तसेच संरक्षणही देते. जीवनचक्रात झाडांचे योगदान मोठे असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले.

निसर्गाचे महत्त्व... 

राज्यपाल पिल्लई म्हणाले की, न्यायव्यवस्थेत स्थानिक भाषांचा समावेश असावा. याचा लोकांना मोठा फायदा होणार आहे. लोक सर्वोच्च आहेत. मग जरी राज्यपाल असला तरी तो लोकांशी बांधील असतो. आपले पुस्तक ट्रेडिशनल ट्रीज ऑफ इंडिया हे देशातील विविध प्रकारची झाडे, निसर्गातील त्यांचे महत्त्व, झाडांचा उपयोग यावर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :goaगोवाDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडPramod Sawantप्रमोद सावंतCourtन्यायालय