शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

माडासंबंधी दुरुस्त्यांना न्यायालयात आव्हान!

By admin | Published: May 03, 2016 1:54 AM

पणजी : माडाला ‘गवत’ बनविण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान देण्यात आले असून

पणजी : माडाला ‘गवत’ बनविण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान देण्यात आले असून सरकारला या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. प्रजल साखरदांडे यांनी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत सरकारने २००८च्या कायद्यात केलेली दुरुस्ती ही अवैध असल्याचे म्हटले आहे. २००८च्या वन कायद्याने केलेल्या दुरुस्तीत माड हे झाडांच्या यादीत टाकण्यात आले होते. माडांचे संवर्धन करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली होती; परंतु भाजप सरकारने २०१६मध्ये नव्याने या कायद्यात दुरुस्ती करताना माडाला गवताच्या यादीत टाकले आहे. नवीन दुरुस्तीमुळे माडांची सरसकट कत्तल होईल, अशी भीती याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. ही दुरुस्ती मागे घेण्याचा आदेश सरकारला देण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकादाराने केवळ माडाचा गवताच्या यादीत समावेश करण्याच्या मागणीला आक्षेप घेतला असे नव्हे, तर नवीन व्याख्येनुसार करण्यात आलेल्या झाडाच्या व्याख्येलाही आक्षेप घेतला आहे. झाड असे संबोधण्यासाठी झाडाच्या घेऱ्याची रुंदी जी वाढविण्यात आली आहे, ती कमी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याचिकादारातर्फे मुंबईचे वकील शिरवई यांनी जोरदार युक्तिवाद केले. २००८च्या कायद्यात करण्यात आलेली दुरुस्ती ही कायदा व घटनेला धरूनच आहे. त्यामुळे ही याचिका दाखल करून घेण्याची काही आवश्यकता नाही, असा दावा सरकारतर्फे युक्तिवाद करताना अतिरिक्त सरकारी वकील प्रवीण देसाई यांनी केला. याचिका दाखल करून घेताना न्यायमूर्ती एफ. एम. रेईश व नूतन साखरदांडे यांच्या खंडपीठाने सरकारला स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला. यानंतरची सुनावणी आता उन्हाळी सुट्टीनंतर म्हणजे १३ जून रोजी होणार आहे. माडाला गवत ठरविणारी वादग्रस्त कायदा दुरुस्ती केल्यानंतर संपूर्ण राज्यात या मुद्द्यावरून संतप्त पडसाद उमटले होते. अनेक आंदोलनेही झाली होती. आमदाराचा संबंध असलेल्या सांगे येथील एका प्रकल्पासाठी माड कापावे लागत असल्यामुळे त्यांची व्यवस्था करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आल्याचा लोकांचा आरोप होता. तसेच गोवा विधानसभेतही याचे जोरदार पडसाद उमटले होते. विरोधी सदस्यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता; परंतु सर्व विरोधाला न जुमानता ही दुरुस्ती करण्यात आली होती. (प्रतिनिधी)