शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Lok Sabha Election 2019 : साऱ्यांचे लक्ष सासष्टीकडे का लागलेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 22:46 IST

दोन दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते, त्याचे प्रमुख कारण ख्रिस्ती प्राबल्याच्या सासष्टी तालुक्यातील मतदान.

- राजू नायक

दोन दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते, त्याचे प्रमुख कारण ख्रिस्ती प्राबल्याच्या सासष्टी तालुक्यातील मतदान. या निवडणुकीत सासष्टीत भरघोस मतदान झाले. जरी २०१४ मध्ये या तालुक्यात ७१. ३६ टक्के मतदान झाले असले तरी या वेळी ते ६९.९ टक्के झाले आहे.

या तालुक्यात विधानसभेचे सात मतदारसंघ येतात व त्यामध्ये मडगाव व फातोर्डा वगळता इतर भागांमध्ये ख्रिश्चनांचे मोठे प्राबल्य आहे. मडगावमध्ये ७१. ७ टक्के मतदान झाले असून २०१४ मध्ये या शहरात ७३. ३ टक्के मतदान झाले होते. या वेळी झालेले कमी मतदान म्हणजे काँग्रेसबद्दल नाराजी आहे का, याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा चालू असली तरी सासष्टीतील ७० टक्के म्हणजेच 1,63,००० मतेच काँग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांना विजयासाठीचे मताधिक्य मिळवून देतील, असे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे.

भाजपालाही सासष्टीतील ख्रिस्ती समाजाच्या एकगठ्ठा मतांची भीती वाटत होती, ती खरी ठरली आहे. ख्रिस्ती मतदारांमध्ये आम आदमी पक्षही लोकप्रिय आहे. या पक्षाने एल्विस गोम्स या माजी मुलकी अधिका-याला उमेदवारी दिली होती व ते काँग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांच्यापेक्षा तरुण व होतकरू असल्याने त्यांच्या पक्षात उत्साह होता. परंतु ‘आप’ला मत म्हणजे भाजपाला मत असेच समीकरण बनले व ख्रिश्चनांनी भाजपाला हरवण्याचा चंगच बांधल्याने त्यांनी एकगठ्ठा मते काँग्रेसला टाकली असे मानले जाते.

तज्ज्ञांच्या मते, २०१४ मध्ये भाजपाला कधी नव्हे ती मोदी लाटेमध्ये ५० हजार मते सासष्टीत प्राप्त झाली होती. नुवेसारख्या मतदारसंघात जेथे संपूर्ण ख्रिस्ती लोकसंख्या आहे, जेथे एरव्ही भाजपाला हजारभर मतेच मिळतात, तेथे त्यांना २०१४ मध्ये चार हजारांहून अधिक मते प्राप्त झाली होती. निरीक्षक मानतात की या निवडणुकीत भाजपाला तेवढीच ५० हजार मते प्राप्त झाली तरीसुद्धा ते निवडणुकीत पैलतीर गाठू शकणार नाहीत, कारण काँग्रेसच्या मतांचा फरक प्रचंड असेल. या तालुक्यात एक लाख ६३ हजारांचे मतदान झाले असून ‘आप’ (ज्यांची मते २० हजारांहून अधिक असणार नाहीत) व भाजपाची ५० हजार मते वजा केली तर काँग्रेस पक्षाला ८० हजारांहून जादा मते मिळविण्यापासून कोणी अडवू शकणार नाही.

काँग्रेस पक्षाची सूत्रे मान्य करतात की मडगाव व केपे या मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी जोरदार कार्य केले असले तरी इतर ठिकाणचे मताधिक्य भाजपाला मिळूनही तो पक्ष सासष्टीचा फरक भरून काढू शकणार नाही. काणकोण, सांगे, सावर्डे, कुडचडे, मुरगाव अशा काही मतदारसंघांमध्ये भाजपाने चांगले कार्य करूनही ते सासष्टीतील फरक पुसून काढू शकणार नाहीत. शिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने फोंडा तालुक्यात दिलेला हात काही प्रमाणात मताधिक्य वाढवायला काँग्रेसला मदत करणार आहे. खाणपट्टय़ातही काँग्रेसला किंचित लाभ होईल. या ख्रिस्ती पाठिंब्यामुळे गेली पाच वर्षे जे अक्षरश: विजनवासात गेले होते ते फ्रान्सिस सार्दिन यांना पुन्हा ‘राजयोग’ प्राप्त झाला तर नवल नाही.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

टॅग्स :Goa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019goaगोवाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक