शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
4
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
5
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
6
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
7
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
8
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
9
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
10
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
11
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
12
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
13
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
14
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
15
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
16
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
17
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
18
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
19
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
20
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक

सशक्त लोकशाहीसाठी अर्थपूर्ण संवाद गरजेचा: उपराष्ट्रपती 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 5:17 PM

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

लोकमत न्यू वर्क पणजी: 'विविधतेतील एकता हे समाजाचे सार आहे. आज राष्ट्राची लोकशाही मजबूत करण्यासाठी अर्थपूर्ण आणि फलदायी संवाद, विचारविमर्श, चर्चा आणि वादविवाद होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेल्या 'वामन वृक्ष कला' या २०० व्या पुस्तकाचे राजभवन येथील न्यू दरबार सभागृहात प्रकाशन केल्यानंतर उपराष्ट्रपती बोलत होते. 

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, माणसामध्ये सर्जनशीलता येतेच. पण ती टिकवून ठेवणे हे अवघड काम आहे. आपल्या प्राचीन वेदांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या सभ्यता, मूल्ये आणि शहाणपणाची आठवण करून देणारे महत्त्वपूर्ण विषयावर लिहिलेले वामन वृक्ष कला हे पुस्तक आहे. राज्यपाल पिल्लई हे प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी इतिहास, कायदा आणि राजकारणापासून अर्थव्यवस्था आणि सामाजिक घडामोडीपर्यंत विविध विषयांवर मल्याळम भाषेत १३० आणि इंग्रजीमध्ये ७० पुस्तके लिहिली आहेत.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी साहित्याच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, प्रत्येक जंगलात तुम्हाला मातृवृक्ष सापडेल, जे सभोवतालच्या झाडांशी नेहमीच संवाद साधत असते. हा संवाद नेहमीच मुळांच्या खाली ठेवला जातो, जो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाला आहे.' मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राज्यपाल पिल्लई हे १९७३ पासून अव्याहतपणे लिहित आहेत. १९८५ नंतर त्यांच्या लिखाणाचा वेग वाढला. त्यात सातत्य राहिले महत्त्वाचे आहे.

गोवा मला भावतो...

उपराष्ट्रपती म्हणाले की, गोवा राज्य हे निसर्गाने भरभरून दिलेले सुंदर असे ठिकाण आहे. येथील संस्कृती तसेच मनमिळावू लोकांमुळे मला नेहमीच गोव्याचे आकर्षण वाटते.

 

टॅग्स :goaगोवा