शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

म्हादई: केवळ ड्रामा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:28 AM

संपादकीयः जलसंसाधनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सभागृह समितीच्या बैठकीनंतर तसे जाहीर केले आहे.

म्हादई नदीचे पाणी वळविल्यामुळे काय परिणाम झाले आहेत किंवा यापुढे काय परिणाम संभवतात याचा अभ्यास करून तज्ज्ञांमार्फत अहवाल तयार करून घेतला जाणार आहे. जलसंसाधनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सभागृह समितीच्या बैठकीनंतर तसे जाहीर केले आहे. परिणामांची अजून सरकारला कल्पनाच नाही, असा याचा अर्थ होतो. यापूर्वी म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविल्यामुळे काय बदल घडून आले याबाबतची माहिती अजून जलसंसाधन खात्याकडे नाही, हेही स्पष्ट होत आहे. मुळात गोवा सरकारला म्हादई नदीचे रक्षण करण्यासाठी केंद्राशी किंवा कर्नाटकशीही संघर्ष करण्याची प्रामाणिक इच्छा नाही. त्यामुळे गोवा सरकारची सध्याची कागदोपत्री धावपळ म्हणजे निव्वळ ड्रामा वाटतो. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बुधवार व गुरुवारी मंगळूरला होते. मंगळूरमध्ये त्यांनी मीडियाशी बोलताना कर्नाटकात पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. ज्या भाजप सरकारने म्हादईप्रश्नी गोव्यावर अन्याय केला, सतत गोवाविरोधी विधाने केली, त्याच पक्षाचे सरकार पुन्हा कर्नाटकात येईल, असे सावंत यांनी जाहीरपणे सांगावे म्हणजे गोमंतकीयांच्या ताज्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. म्हादईचे रक्षण करण्याबाबत गोवा सरकार गंभीर आहे, असे लोकांनी का म्हणून समजावे?

जलसंसाधनमंत्री शिरोडकर यांनी बैठक घेण्याचा सोपस्कार बुधवारी पार पाडला. आम्ही म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकला मान्यता दिली व ती देताना गोवा सरकारलाही सोबत घेतले होते, असे विधान अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हुबळी येथे केले. त्यानंतर विजय सरदेसाई वगैरे विरोधी आमदार थोडे आक्रमक झाल्यामुळेच शिरोडकर यांनी सभागृह समितीची बैठक बोलावली होती. समितीचे सदस्य असलेल्या आमदारांनी बैठकीत सहभागी होऊन जलसंसाधन खात्याचे सादरीकरण पाहिले. केंद्र सरकारचा पूर्ण डोळा सध्या कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीवर आहे. कर्नाटकमध्ये जिंकायचे असेल, तर म्हादईबाबत पूर्णपणे कर्नाटकचीच साथ द्यायला हवी, हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी ठरवलेलेच आहे. गोमंतकीयांच्या अस्तित्वाचा आणि भावनांचा जरादेखील विचार न करता केंद्राने कर्नाटकची जी साथ दिली आहे, ती कधी विसरता येणार नाही.

कळसा भांडुरा डीपीआर रद्द करून घ्या, ही विरोधी पक्षांची मागणी आहे. केंद्राकडे पुन्हा एकदा शिष्टमंडळ नेऊन डीपीआरला दिलेली मंजुरी मागे घ्या, असे सुचविण्याचे धाडस गोवा सरकारकडे नाही. अशावेळी वेळ मारून नेण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. विजय सरदेसाई म्हणतात, त्याप्रमाणे हा सगळा टाइमपास करण्याचा मामला आहे. कर्नाटकची निवडणूक पार पडेपर्यंत गोवा सरकार टाइमपास करत राहील. एका बाजूने न्यायालयीन लढाई सुरू राहील, त्यात गोमंतकीयांचा पैसा खर्च होत राहील आणि दुसऱ्या बाजूने गोवा सरकार विरोधी पक्षांना व एनजीओंना झुलवत ठेवण्यासाठी नवनव्या कल्पना लढवत राहील. आता यापुढे तज्ज्ञांची समिती नेमणे आणि परिणामांचा अभ्यास करून घेणे हा टाइमपासाचाच एक भाग आहे, असे सरदेसाई यांना वाटणे स्वाभाविक आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगश हे म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करा, असे सुचवतात. सरकारला ही मागणी मान्य होणार नाही. गोव्यात राष्ट्रपती राजवट होती व केंद्रात वाजपेयी सरकार होते, त्या काळात म्हादई व नेत्रावळी ही अभयारण्ये अधिसूचित करण्यात आली होती. त्याबाबतही अजून खूप वाद आहेत. तशात पुन्हा म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र म्हणून राखीव करणे सत्तरी तालुक्यातील लोकांनाही पसंत पडणार नाही. कडक वनविषयक कायदे, जंगलातील लोकवस्ती आणि अभयारण्यांशी निगडित नियम म्हणजे काय हे सगळे काणकोण व सत्तरी तालुक्यांतील अनेक कुटुंबे अनुभवत आहेत. 

म्हादई नदीचे रक्षण व्हायला हवे, असे अनेक गोमंतकीयांना वाटते. सरकार व विरोधकही याबाबत राजकारण खेळत असले तरी, शेवटी म्हादई नदी आटली, तर आपल्या सर्वांच्याच नव्या पिढीला परिणाम भोगावे लागणार आहेत. गोवा सरकारला जर ड्रामाच करायचा असेल, तर मग पुढील पाच वर्षे विविध समित्या नेमणे व तज्ज्ञांचे अहवाल घेत बसणे हाच चांगला धंदा होऊ शकेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा