शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गोव्यातील आगोंद-गालजीबाग किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 603 पिलांचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 19:17 IST

काणकोण तालुक्यातील आगोंद आणि गालजीबाग या किनारपट्टीवरील 18 ठिकाणी कासवांनी आपली अंडी घातल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत वन खात्याने 603 कासवांची पिल्ले पाण्यात सोडली आहेत.

मडगाव - पर्यावरण प्रेमीसाठी आणि विशेषत: कासव संवर्धन मोहिमेत रस घेणाऱ्यांसाठी खुशखबर! गोव्याच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचे आगमन यावेळी काहीसे उशिरा झालेले असले तरीही आतापर्यंत काणकोण तालुक्यातील आगोंद आणि गालजीबाग या किनारपट्टीवरील 18 ठिकाणी कासवांनी आपली अंडी घातल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत वन खात्याने 603 कासवांची पिल्ले पाण्यात सोडली आहेत.

दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील आगोंद हा किनारा कासव पैदासीसाठी देशातीलच नव्हे तर आशियातील मुख्य किनाऱ्यांपैकी एक असून, आतापर्यंत 18 ठिकाणी या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणा-या या समुद्री पर्यटकांनी 2000 पेक्षा अधिक अंडी घातली आहेत. मागच्या वर्षी एकूण 19 ठिकाणी कासवांनी अंडी घातली होती. यातून 1317 पिल्ले जन्माला आली होती.वन खात्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, 2016-17 हे वर्ष कासव प्रजोत्पादनासाठी महत्वाचे ठरले होते. त्यावर्षी आगोंद व गालजीबाग या किनारपट्टीवर एकूण 28 ठिकाणी अंडी घालण्यात आली होती. विभागीय वन अधिकारी विक्रमादित्य गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आगोंद किना-यावरील 18 अंडी घातलेल्या जागेपैकी सहा जागांतून 516 कासवांची पिल्ले पाण्यात सोडण्यात आली तर गालजीबागच्या तीन पैकी एका जागेत घातलेल्या अंडय़ातून 87 पिल्ले बाहेर आली.यंदा नेहमीपेक्षा या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी कासव उशिरा आले होते तरीही आतापर्यंत 2461 अंडी घातली असून या अंडय़ांची वन खाते डोळ्यात तेल घालून निगराणी करत आहे. उन्हाळा संपेपर्यंत या किनारपट्टीवर कासवे अंडी घालण्यासाठी येणार असल्याची माहिती संबंधित सुत्रकडून मिळाली. पावसाळ्यात कित्येकदा कासवे किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी क्वचितच येत असतात. ही अंडी उबवण्यासाठी जर योग्य असे गरम वातावरण असेल तरच ही कासवे पावसाळय़ात अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात अन्यथा येत नाहीत, असे सांगण्यात आले.

टॅग्स :goaगोवाNatureनिसर्ग