शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धरणात केवळ ३५ टक्केच पाणी; साळावलीची पातळी घटली, तिळारीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2024 11:10 IST

गोमंतकीयांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण गोव्यात बहुतांश लोकांची तहान भागविणारे राज्यातील सर्वात मोठे जलाशय असलेल्या साळावली धरणात केवळ ३५ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिले आहे. त्यामुळे गोमंतकीयांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

हवामान खात्याचा मान्सूनविषयक अंदाज लक्षात घेता, या शिल्लक ३५ टक्के पाण्यात उर्वरित ३५ दिवस भागविण्याचे आव्हान आहे. साळावली धरणाची पूर्ण क्षमता ही २३,४३६ हेक्टामीटर आहे. १ टक्का पाणी म्हणजे २३४.३६ हेक्टामीटर. सध्याच्या पाणी साठ्याच्या हिशेबाने ३५ टक्के साठा हा ८२०२ हेक्टामीटर असा होतो.

जलस्रोत खात्याच्या नोंदीनुसार साळावलीत सव्वाआठ हजार हेक्टामीटर पाणीसाठा शिल्लक आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून यंदा गोव्यात वेळेवर म्हणजे ४ ते ५ जूनपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मान्सूनला गोव्यात दाखल होण्यासाठी ३५ दिवस आहेत आणि ३५ टक्के उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यात तोपर्यंत भागवावे लागणार आहे.

राज्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या अंजुणेमध्ये क्षमतेच्या ३९ टक्के म्हणजेच १०६९ हेक्टामीटर पाणीसाठा शिल्लक आहे. काणकोणचे चापोली धरण निम्मे आटले असून ५५९ हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे. ५८५ हेक्टामीटर क्षमतेच्या आमठाणे धरणात ३४ टक्के इतके म्हणजेच २०० हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे. आमठाणे प्रकल्पात ११४ हेक्टामीटर तर गावणे प्रकल्पात ८७ हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे.

तिळारीचा दिलासा

तिळारीचे विशाल जलाशय हे गोव्यासाठी दिलासादायक आहे. हे धरण महाराष्ट्रात जरी असले तरी या धरणाच्या ७४ टक्के पाण्याचा वापर हा गोव्यासाठीच आहे. तसेच ४६ हजार हेक्टामीटर पाण्याच्या क्षमतेच्या या धरणात अजूनही १८ हजार हेक्टामीटरपेक्षा अधिक पाणी शिल्लक आहे. त्यामुळे विशेषतः उत्तर गोव्यासाठी ही अत्यंत आश्वासक बाब आहे.

साळावली धरणात ३५ टक्के पाणी शिल्लक असले तरी या धरणाची क्षमताच फार मोठी असल्यामुळे हे ३५ टक्के पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार आहे. शिवाय मान्सून गोव्यात दाखल होण्यापूर्वी मान्सूनच्या पूर्वसरी गोव्याला दिलासा देतील. - सुभाष शिरोडकर, जलस्रोत मंत्री 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणी