शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'; जीवनविद्या मिशनचे अलौकिक कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2024 08:01 IST

ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, सद्गुरूंना त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, सखोल चिंतन यांच्या मिलनातून जीवनविद्या साकार झाली.

- प्रल्हाद वामनराव पै.

ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, सद्गुरूंना त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, सखोल चिंतन यांच्या मिलनातून जीवनविद्या साकार झाली. जीवनविद्या तत्त्वज्ञान धर्मातीत, वैश्विक व शाश्वत आहे. जीवनविद्या हे संपूर्ण 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या सिद्धांताभोवती फिरते.

सध्याच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाचे जीवन वेगवान व यांत्रिक बनले आहे. सर्वसामान्य माणूस सुख, शांती, समाधानाला पारखा झाला आहे. गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत किंवा अपयश आल्यास औदासिन्य येणे, दैववादाची कास धरणे यांचे प्रमाण समाजात वाढत आहे. अज्ञान व अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात दिसते. या सर्व समस्यांवर जीवनविद्येचा प्रकाश टाकून श्री सद्‌गुरूंनी समाजाला जीवन जगण्याची नवीन दिशा दाखविली आहे.

२०२३-२४ हे वर्ष श्री सद्‌गुरूंचे जन्मशताब्दी वर्ष आम्ही साजरे केले. "प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची" या श्री सद्‌गुरूंच्या शिकवणीनुसार भारतात आणि परदेशात अनेक प्रबोधने, घरोघरी आणि सामुदायिक रीतीने विश्व प्रार्थना जपयज्ञ मोठ्या प्रमाणात झाले. सदगुरू वामनराव पै हे माझे वडील. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९२३ साली बलीप्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर गिरगावातील आंग्रेवाडीत झाला. मुंबईतील नामांकित रुईया कॉलेजमधून अर्थशास्त्रातून बी. ए. पदवी घेतली. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात उपसचिव पदावर नोकरी केली. ते १९८१ साली निवृत्त झाले.

आध्यात्मिक वाटचालीकरिता दादर येथील विवेकानंद वाचनालयात रामकृष्ण कामत यांचे 'नामजपाचे महत्त्व' हे पुस्तक त्यांनी वाचले. त्यांनी नामाचा अखंड छंदच घेतला. १९४८ साली श्रीगोंदा येथे प. पू. नाना महाराज गोंदेकर यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला. दरम्यान स्पिरिच्युअल सेंटर, गावदेवी येथे दादासाहेब सबनीस यांनी प्रवचने होत असत. प्रवचन ऐकण्यास श्री सद्‌गुरू नियमित जायचे. एकदा हॉल श्रोतृवर्गाने तुडुंब भरला होता आणि दादासाहेब काही कारणाने येऊ शकले नाहीत. काहींनी सुचविले वामनराव पै यांनी प्रवचन करावे. लोकाग्रहामुळे ते व्यासपीठावर आले आणि त्यांनी प्रवचन केले. ते त्यांचे पहिले प्रवचन होते. श्रोते मात्र मंत्रमुग्ध झाले. पुढे त्यांची त्या सेंटरला नियमित प्रवचने सुरू झाली. थोर क्रांतिकारक मा. सेनापती बापट सद्‌गुरूंची प्रवचने ऐकण्यास नेहमी येत. १९५५ साली चिंचपोकळी येथील कामगार विभागात सद्‌गुरूंची प्रवचने सुरू झाली.

जीवनाच्या वाटचालीत सुख, समाधान, आनंद प्राप्त होण्यासाठी प्रपंच व परमार्थ या दोन्हीची नितांत आवश्यकता असते. प्रपंच व परमार्थ एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत. असमाधानाकडून समाधानाकडे, दुःखाकडून सुखाकडे व तिमिरातून प्रकाशाकडे नेणाऱ्या आणि प्रपंच व परमार्थ यांची सांगड घालून समतोल राखणाऱ्या विद्येला त्यांनी 'जीवनविद्या' नाव दिले. ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, सद्‌गुरूंना त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, सखोल चिंतन यांच्या मीलनातून जीवनविद्या साकार झाली. जीवनविद्या तत्त्वज्ञान धर्मातीत, वैश्विक व शाश्वत आहे. जीवनविद्या हे संपूर्ण' तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या सिद्धांताभोवती फिरते. सद्‌गुरूंच्या प्रबोधनातून बोध घेऊन लाखो लोकांनी प्रयत्नवादाची कास धरली. त्यांच्या जीवनातील कर्मकांडे, अंधश्रद्धा गळून पडल्या. जीवनविद्या आचरणात आणणारी माणसे स्वतःबरोबर इतरांचा, समाजाचा, राष्ट्राचा विचार करू लागली. स्त्रियांचा सन्मान करू लागली. केवळ सद्‌गुरूंच्या प्रबोधनामुळे हजारो लोक व्यसनमुक्त झाले. विद्यार्थी अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास होऊ लागले. आज हीच मुले देश परदेशात नोकऱ्या व्यवसाय करीत आहेत. अनेकांचे मोडायला आलेले संसार जीवनविद्या तत्त्वज्ञानाने सुरळीत चालत आहेत.

श्री सद्‌गुरू वंदनीय तर आहेतच परंतु आचरणीयदेखील आहेत. सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्यांनी नोकरी केली, संसार केला. आम्ही दोन भावंडे मी आणि माझी बहीण मालन, आम्हाला सुसंस्कार आणि उच्चशिक्षण दिले. जे जे सांगितले ते स्वतः प्रथम आचरण केले. Love, work and bless all ही त्यांची शिकवण. माणसाने त्याच्या वाट्याला आलेले समाज उपयुक्त काम आवडीने, प्रेमाने, कौशल्याने आणि प्रामाणिकपणे कसे करावे यावर ते मार्गदर्शन करीत असत.  

टॅग्स :goaगोवाWamanrao Paiवामनराव पैPrallhad Paiप्रल्हाद पै