शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

'खाणप्रश्‍नी भाजपकडे तोडगा नाहीच, पर्रीकर यांनीच खाणी बंद करून घोळ घातला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 16:25 IST

बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले

पणजी - राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरु करण्यासाठी भाजपकडे कोणताही तोडगा नाही. २०१२ मध्ये पर्रीकर मुख्यमंत्री असताना भाजपनेच खाणी बंद केल्या. हा पक्ष यावर मुळीच तोडगा काढू शकणार नाही, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसने केला आहे. पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. यतिश नायक यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढाच वाचला. 

ते म्हणाले की, बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले. जीएसटी, नोटाबंदीने खाजगी उद्योगही मारून टाकले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती  त्याची पुनरावृत्ती आता केली जात आहे. २०१४ मध्येही खाणी सुरू करू, असे आश्‍वासन भाजपने दिले होते. परंतु आज २०१९ उजाडला तरी हे आश्वासन भाजप पूर्ण करू शकला नाही. पुन्हा पुन्हा फसवून घ्यायला गोव्याचा मतदार मूर्ख नव्हे, असे नायक म्हणाले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की 'खाण प्रश्न सोडवणार असे आश्वासन देणाऱ्या भाजपने हा प्रश्न नेमका कसा सोडवणार? त्यांच्याकडे काय तोडगा आहे? हे स्पष्ट केलेले नाही. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कोणतेही ठोस धोरण आणि स्पष्टता भाजपकडे नाही. आज लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार खाण पट्ट्यातील मतदारसंघांमध्ये फिरतात तेव्हा त्यांना अवलंबित याचा जाब विचारतात, परंतु भाजपच्या या उमेदवारांकडे उत्तर नसते. मध्यंतरी अवलंबितांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रश्नावर केवळ 'देखता हूँ', असे म्हणून बोळवण केली.

केंद्रीय आयुषमंत्री तथा भाजपचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत खाण प्रश्‍नावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवाल नायक यांनी केला. भाजप जनतेकडे खोटारडेपणा करत आहे. लोकांची फसवणूक करत आहे, असे आरोप त्यांनी केले. देशभरात जीएसटी, नोटाबंदी आणून भाजपने खाजगी क्षेत्रही मारून टाकले. यामुळे बेकारी प्रचंड वाढलेली आहे आणि त्याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप नायक यांनी केला. ते म्हणाले की, 'अच्छे दिन आयेंगे', असे २०१४ च्या निवडणुकीत भाजप म्हणत होता. आता अच्छे दिन आलेही म्हणत नाही आणि अच्छे दिन येतील असे म्हणत नाही. आता त्यांनी 'चौकीदारा'चा जयघोष चालवला आहे, अशी टीका करत लोक त्यांना स्वीकारणार नाहीत, गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीच्या तिन्ही जागा काँग्रेस उमेदवारच जिंकतील, असा दावा नायक यांनी केला. केंद्रात आणि कालांतराने राज्यातही काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस विजय पै, साळगांव गटाध्यक्ष अतुल नाईक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकर