शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोव्याला कोळसा हब बनवण्याचा डाव; खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची लोकसभेत चौफेर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2024 08:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : ' गोवा हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. मात्र आता गोव्याला कोळसा ...

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'गोवा हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. मात्र आता गोव्याला कोळसा हब बनवण्याचा डाव खेळला जात आहे' असा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत केला.

लोकसभेतील भाषणात खासदार विरियातो म्हणाले की, 'गोवा हे सुंदर राज्य अशी अनेकांची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षांत गोमंतकीय लोकांवर कटकारस्थान रचून प्रकल्प लादले जात आहे. प्रकल्पांबाबत लोकांना विश्वासात घेतले जात नाही. केवळ कोळसा वाहतुकीसाठी हे सर्व केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

फर्नांडिस म्हणाले, की सरकारने गोव्यातील नद्या आपल्या ताब्यात घेतल्या. सहा नद्यांचे अगोदर राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर कोविड काळात रेल्वे दुपदरीकरण, तामनार प्रकल्प तसेच महामार्ग विस्तारीकरण असे तीन प्रकल्प लोकांवर लादले. प्रकल्पांना विरोध होत असूनही ते पुढे रेटले जात आहेत. सरकारने काही सांगितले तरी या प्रकल्पांद्वारे केवळ कोळसा वाहतुकीला चालना देण्यासाठी व गोव्याला कोळसा हब बनवण्यासाठी हे सर्व केले जात आहे' असा आरोप त्यांनी केला.

'गोवा १९६१ साली पोर्तुगिजांच्या राजवटीतून मुक्त झाले. तेव्हापासून राज्यात पर्यटन उद्योग हे एकमेव क्षेत्र आहे, जे चांगले काम करीत आहे. खाण बंदीनंतर पर्यटन उद्योगात कार्यरत आहे. कृषी क्षेत्र अपेक्षेनुसार काम करीत नाही. कृषी क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. अशातच गोव्याला कोळसा हब बनवू देऊ नका. सरकारने प्रकल्प आणताना जनतेला विश्वासात घ्यावे. कारण पर्यटन हा एकमेव उद्योग आहे, जो युवकांना रोजगार देतो. अन्यथा राज्य उद्ध्वस्त होईल, अशी भीतीही फर्नाडिस यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :goaगोवाlok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेस