शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
5
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
6
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
7
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
8
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
9
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
10
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
11
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
12
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
13
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
14
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
15
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
16
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
17
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
18
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
19
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
20
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका

पर्वरीत वाहतूक कोंडी वाढते पाेलिसांनी गाड्या थांबवून तपासणी करु नये; पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांचे पाेलिसांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2024 15:23 IST

पर्वरी मतदारसंघातील मान्सून कामाची बैठक घेतली यात पंचायत लाेकप्रतिनिधी उपस्थित होते.

नारायण गावस, पणजी: पर्वरी महामार्गावर वाहतूक कोंडी वाढत असल्याने या रस्त्यांवर वाहतूक पाेलिसांनी गाड्या अडवून तपासणी करु नये. यासाठी वाहतूक अधीक्षक तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे, असे पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांनी सांगितले. गुरुवारी पर्वरी मंत्रालयात मंत्री राेहन खंवटे यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत पर्वरी मतदारसंघातील मान्सून कामाची बैठक घेतली यात पंचायत लाेकप्रतिनिधी उपस्थित होते.

पर्वरीतील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी हाेत असते त्यात वाहतूक पाेलीस मध्येच राहून वाहनांना दंड घालत असल्याने वाहतूक कोंडी वाढते. त्यामुळे पाेलिसांनी पर्वरी काढून सुकूर किंवा पणजीत वाहनांची तपासणी करावी. यामुळे या भागातील वाहतूक काेंडी कमी होऊ शकते. मंत्री राेहन खंवटे म्हणाले या विषयी आम्ही वाहतूक पाेलिसांना आदेश दिले आहे. तसेच पर्वरी परिसरात बेकायदेशीर रस्त्यांचे खोदकाम करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

मंत्री राेहन खंवटे म्हणाले, या बैठकीत पर्वरीतील वीज समस्या, पाणी समस्या तसेच आराेग्य तसेच इतर सेवाविषयी चर्चा करण्यात आली. यात उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांना १५ दिवसांनी या बैठकीचा पंचायत प्रतिनिधीसोबत आढावा घेण्यास सांगितले आहे. पर्वरी भागात यंदा डेंग्यूचे रुग्ण वाढू नये यासाठी खास काळजी घेण्याचे आवाहन आराेग्य अधिकाऱ्यांना केेले आहे. तसेच या परिसरात वारंवार वीज जात असल्याने त्यांची ही समस्या दूर करण्याचे आदेश वीज अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे पर्वरी मतदारसंघात भागातील शेतीमध्ये पाणी घुसते तसेच शेतकऱ्यांच्या इतर समस्या जाणून घेण्यास कृषी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

मंत्री खंवटे म्हणाले, पर्वरी महमार्गावर उड्डाण पूल हाेणार आहे पण त्यासाठी अगोदर आम्ही या रस्त्यांची राहीलेली कामे पूर्ण करणार आहोत. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड राेडची कामे अगोदर करणार आहोत. यात सर्व पंचायत प्रतिनिधींना एकत्र घेऊन ही कामे केली जाणार आहे. तसेच या रस्त्याच्या चौपदीकरणासाठी अगोदर लोकांना विश्वासात घेतले जाणार आहे. महामार्ग प्राधिकरणाशी या विषयी चर्चा करण्यात येणार तसेच मुख्यमंत्र्यांच्या पाहणी नंतर याचे काम हाती घेतले जाणार आहे. पर्वरीतील नागरिकांना व्यापाऱ्यांना कुठलाच त्रास हाेणार नाही याची पूर्णतयारी करुन महामार्गाचे काम आणि उड्डाण पुलाचे काम होणार आहे.

मंत्री खंवटे म्हणाले, अनेक पर्यटक साेशल मिडीयावर पाहून असुरक्षित स्थळावर जात असतात आणि तिथे कुठलीच सुरक्षितता नसल्याने आपला जीव गमावतात. यासाठी आता पर्यटन खाते परिपत्रक जारी करुन किंवा जागृती निर्माण करुन पर्यटक आणि स्थानिकांनी कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यास सांगेल जाणार आहे. यामुळे असुरक्षित ठिकाणी पर्यटन जाणार नाही. स्थानिकांनीही याची दखल घ्यावी आपल्या भागातील असुरक्षित चिरेखाणीत तसेच इतर भागात जाऊ नये.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन