शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पर्वरीत वाहतूक कोंडी वाढते पाेलिसांनी गाड्या थांबवून तपासणी करु नये; पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांचे पाेलिसांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 3:23 PM

पर्वरी मतदारसंघातील मान्सून कामाची बैठक घेतली यात पंचायत लाेकप्रतिनिधी उपस्थित होते.

नारायण गावस, पणजी: पर्वरी महामार्गावर वाहतूक कोंडी वाढत असल्याने या रस्त्यांवर वाहतूक पाेलिसांनी गाड्या अडवून तपासणी करु नये. यासाठी वाहतूक अधीक्षक तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे, असे पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांनी सांगितले. गुरुवारी पर्वरी मंत्रालयात मंत्री राेहन खंवटे यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत पर्वरी मतदारसंघातील मान्सून कामाची बैठक घेतली यात पंचायत लाेकप्रतिनिधी उपस्थित होते.

पर्वरीतील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी हाेत असते त्यात वाहतूक पाेलीस मध्येच राहून वाहनांना दंड घालत असल्याने वाहतूक कोंडी वाढते. त्यामुळे पाेलिसांनी पर्वरी काढून सुकूर किंवा पणजीत वाहनांची तपासणी करावी. यामुळे या भागातील वाहतूक काेंडी कमी होऊ शकते. मंत्री राेहन खंवटे म्हणाले या विषयी आम्ही वाहतूक पाेलिसांना आदेश दिले आहे. तसेच पर्वरी परिसरात बेकायदेशीर रस्त्यांचे खोदकाम करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

मंत्री राेहन खंवटे म्हणाले, या बैठकीत पर्वरीतील वीज समस्या, पाणी समस्या तसेच आराेग्य तसेच इतर सेवाविषयी चर्चा करण्यात आली. यात उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांना १५ दिवसांनी या बैठकीचा पंचायत प्रतिनिधीसोबत आढावा घेण्यास सांगितले आहे. पर्वरी भागात यंदा डेंग्यूचे रुग्ण वाढू नये यासाठी खास काळजी घेण्याचे आवाहन आराेग्य अधिकाऱ्यांना केेले आहे. तसेच या परिसरात वारंवार वीज जात असल्याने त्यांची ही समस्या दूर करण्याचे आदेश वीज अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे पर्वरी मतदारसंघात भागातील शेतीमध्ये पाणी घुसते तसेच शेतकऱ्यांच्या इतर समस्या जाणून घेण्यास कृषी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

मंत्री खंवटे म्हणाले, पर्वरी महमार्गावर उड्डाण पूल हाेणार आहे पण त्यासाठी अगोदर आम्ही या रस्त्यांची राहीलेली कामे पूर्ण करणार आहोत. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड राेडची कामे अगोदर करणार आहोत. यात सर्व पंचायत प्रतिनिधींना एकत्र घेऊन ही कामे केली जाणार आहे. तसेच या रस्त्याच्या चौपदीकरणासाठी अगोदर लोकांना विश्वासात घेतले जाणार आहे. महामार्ग प्राधिकरणाशी या विषयी चर्चा करण्यात येणार तसेच मुख्यमंत्र्यांच्या पाहणी नंतर याचे काम हाती घेतले जाणार आहे. पर्वरीतील नागरिकांना व्यापाऱ्यांना कुठलाच त्रास हाेणार नाही याची पूर्णतयारी करुन महामार्गाचे काम आणि उड्डाण पुलाचे काम होणार आहे.

मंत्री खंवटे म्हणाले, अनेक पर्यटक साेशल मिडीयावर पाहून असुरक्षित स्थळावर जात असतात आणि तिथे कुठलीच सुरक्षितता नसल्याने आपला जीव गमावतात. यासाठी आता पर्यटन खाते परिपत्रक जारी करुन किंवा जागृती निर्माण करुन पर्यटक आणि स्थानिकांनी कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यास सांगेल जाणार आहे. यामुळे असुरक्षित ठिकाणी पर्यटन जाणार नाही. स्थानिकांनीही याची दखल घ्यावी आपल्या भागातील असुरक्षित चिरेखाणीत तसेच इतर भागात जाऊ नये.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन