शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पे पार्किंग पुढे ढकला : पणजीकरांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 1:39 PM

राजधानीत स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीतील बहुतांश रस्ते खोदले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने पार्क करायला मिळत नव्हती यासाठी पणजी महानगर पालिकेने गेले दाेन महिने पणजीतील पे पार्किंग बंद ठेवली हाेती.

नारायण गावस

पणजी - राजधानी पणजी अजूनही स्मार्ट सिटीची कामे संपलेली नाही वाहनचालकांना होणारा त्रास संपलेला  नाही अशा स्थितीत पणजी महानगर  पालिकेने शहरात पें पार्किंग शुल्क आकारणी पुन्हा सुरु केल्याने पणजीवासियांनी तसेच पणजीत येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे पणजी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होईपर्यत पे पार्किंग आकारु नये असे पणजीवाकरांकडून मागणी केली जात आहे. 

राजधानीत स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीतील बहुतांश रस्ते खोदले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने पार्क करायला मिळत नव्हती यासाठी पणजी महानगर पालिकेने गेले दाेन महिने पणजीतील पे पार्किंग बंद ठेवली हाेती. पण आता पणजीतील बहुतांश रस्त्यांचे हाॅटमिक्सींगचे काम पूर्ण झाल्याने पणजी महानगर पालिकेचे महापौर  राेहित मोन्सेरात यांनी  १ जून पासून हे पे पार्किंग पुन्हा सुरु केली आहे. तसेच पाहिल्यास पणजीत अजूनही बहुतांश रस्ते खाेदलेले आहेत. अनेक ठिकाणी मातीचे ढीगार आहेत. वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही पे पार्किंग आणखी  काही दिवस पुढे ढकलावी अशी मागणी केली जात आहे. 

राजधानीत वाहतूकीला शिस्त  यावी पणजीत होणारी वाहतूक काेंडी कमी व्हावी यासाठी पणजीत महानगर पालिकेने राजधानीत पे पार्किंग सुरु केली आहे. पण पणजी  स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याने वाहतूक  कोडी ही नित्याची झाली आहे.  ठिकठिकाणी  रस्ते खोदले असल्याने वाहनांना व्यवस्थित पार्किंग करायला जागाच मिळत नाही. लोकांना पे पार्किगच त्रास जाणवत होता. म्हणून फक्त दाेन महिने पे पार्किंग बंद करुन आता पुन्हा सुरु केल्याने लाेक नाराज आहे. स्मार्ट  सिटीचे काम पूर्ण होईपर्यंत राजधानीत पे पार्किंग घेऊ नये असे काही जणांचे मत आहे. 

पणजी स्मार्ट सिटीचे काम ९० टक्के झाले म्हटले तरी अजून काम पूर्ण झालेली नाही यातच आता पे पार्किंग करुन पणजीकरांच्या त्रासात आणखी पाडणार आहे. पणजीचे आमदार आणि मनपाच्या महापौरांनी कुणाची तरी आर्थिक भर करुन देण्यासाठी ही घाईगडबीडीत पे पार्किंग सुरु केली आहे. यात पणजी करांना विश्वासात घेतलेले नाही, असे शैलेद्र वेलिंगकर यांनी सांगितले.

पणजीतील स्मार्ट सिटीची कामे अजून अपूर्ण आहे त्यामुळे पणजी महानगर पालिकेने पे पार्किंग सुरु करुन नये असे सांगितले. खोदकामुळे वाहनाचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत पे पार्किंग आकारणे चुकीचे आहे असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा