शहरं
Join us  
Trending Stories
1
"परम मित्र मोदी, तुम्हाला रशियात पाहून..."; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेत केलं खास स्वागत 
2
मुंबई मनपा हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, यंत्रणांना सुसज्ज राहण्याचेही निर्देश
3
पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश
4
नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय
5
पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय
6
जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा
7
Rahul Gandhi Manipur Visit: "इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!
8
'डोनाल्ड ट्रम्प यांचा मीच पराभव करणार', जो बायडेन यांचा उमेदवारी सोडण्यास नकार...
9
कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी
10
महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर 
11
वाघ नखांबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका; म्हणाले...
12
"IPLच्या वेळी Hardik Pandya म्हणाला होता- लोकं शिव्या देतायत पण..."; Ishan Kishan ने सांगितली आठवण
13
मुलाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानी यांना लागला 14,91,862,00,000 रुपयांचा जॅकपॉट; पाहा...
14
मासिक पाळीत नोकरदार महिलांना सुट्टी? सर्वोच्च न्यायालयाला वाटतेय मोठी भीती, आम्ही आदेश दिला तर...
15
अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे बर्बाद झालं या अभिनेत्रींचं करिअर, कोणी देश सोडला, तर कुणी भोगला तुरूंगवास
16
Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप
17
अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल!
18
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, मुलांच्या रुग्णालयासह ५ मोठ्या शहरांना लक्ष्य, २० लोकांचा मृत्यू
19
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर; कर्णधार टेम्बा बवुमाची एन्ट्री
20
नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."

खनिज वाहतुकीसाठी केंद्राला साकडे; मुख्यमंत्री पर्यावरणमंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 11:50 AM

त्या ४० गावांसह सीआरझेडचा प्रश्न मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : हायकोर्टाच्या बंदीमुळे गावांमध्ये खनिज वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. यावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज, सोमवारी केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहेत. राज्याच्या पश्चिम घाटात पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित झालेल्या ९९ गावांपैकी किमान ४० गावे वगळावीत, अशीही मागणी ते करणार असून, सीआरझेडचा प्रश्नही मांडणार आहेत.

जीएसटी मंडळाच्या बैठकीसाठी शुक्रवारी दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री अजूनही राजधानीतच आहेत. या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, खनिज वाहतूक कोणत्याही परिस्थितीत चालू व्हायला हवी. गावात आज एकही ट्रक खनिज वाहतूक करू शकत नाही. सरकारने खाण व्यवसाय सुरू व्हावा यासाठी नऊ खाण ब्लॉकचा लिलाव केला. काही कंपन्यांनी ईसी वगैरे मिळविल्या. परंतु कोर्टाच्या निर्बंधांमुळे गावांमध्ये खनिज वाहतूक करता येत नाही. 

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यावर कायदेशीर तोडगा काढून गोमंतकीय जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मी करणार आहे. सीआरझेडमुळे वाळू उपसा अडलेला आहे. किनारपट्टीवरील बांधकामेही संकटात आहेत. या प्रश्नावरही मी केंद्रीय मंत्र्यांकडे बोलेल. तसेच पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केलेले काही गावे वगळावीत, अशीही मागणी करणार आहे. 

दरम्यान, पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागांच्या अधिसूचनेचा मसुदा जाहीर झाला आहे. त्यात राज्यातील १४६१ चौरस किमी क्षेत्राचा समावेश झालेला आहे. यात सत्तरी तालुक्यात सर्वाधिक ५६, सांगे तालुक्यात ३८, तर काणकोण तालुक्यात ५ गावांचा समावेश आहे. भिरौंडा, पिसुर्ले यांसारख्या ठिकाणी खाणी आहेत. उद्या हा भाग जर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केला गेला, तर खाणीही सुरू करणे अशक्य होईल. सांगे तालुक्यातही हीच स्थिती आहे. त्यामुळे या भागातील आमदारांनीही अधिसूचनेस विरोध केला आहे.

राज्य सरकारचा प्रस्ताव

तीन निकषांवर हे गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील ठरवण्यात आले आहेत. मसुदा अधिसूचनेतून ४० गावे वगळण्यात यावीत, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे ५९ गावे राहतील. आणखी १० गावांचा हवा तर समावेश करून ६९ गावे अधिसूचित करता येतील, असा प्रस्ताव सरकारकडून ठेवला जाऊ शकतो.

वाळू व्यवसायही अडकलेलाच

राज्यात वाळू उपसा व्यवसायही अडलेला आहे. हा आणखी एक मोठा प्रश्न सरकारसमोर आहे. वाळू टंचाईमुळे अनेक बांधकामे रखडली आहेत. वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यासाठी केंद्राला विनंती केली जाईल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) ने अहवालात ठळकपणे नमूद केले आहे की, वाळू मुख्यतः सीआरझेड भागात उपलब्ध आहे. २०११ व २०१९ च्या सीआरझेड अधिसूचनेनुसार सीआरझेड क्षेत्रातील वाळू उत्खनन प्रतिबंधित असले तरी नद्यांमध्ये निर्माण होणारे वाळूचे पट्टे, जे अंतर्गत जल वाहतुकीसही अडथळा ठरतात, ते हटण्यासाठी वाळूच्या पट्ट्यांमधून वाळू उपशाला परवानगी मिळू शकते, असे सरकारला वाटते. त्या दृष्टिकोनातून आता केंद्रीय मंत्र्यांकडे प्रयत्न केले जातील. राज्य सरकारने वाळू उपशासाठी विस्तृत पर्यावरणीय परिणाम अभ्यास (ईआयए) केला आहे. मार्गदर्शक तत्त्वे हाताने वाळू काढण्याची परवानगी देतात आणि वाळूच्या पट्ट्यांमधून काढलेली वाळू बांधकामासाठी वापरता येईल, असे सरकारचे म्हणणे आहे. एनआयओने शापोरा, मांडवी आणि जुवारी नद्यांचा अभ्यास पूर्ण केला आहे.

व्याघ्र प्रकल्पाबाबतही होणार चर्चा

दरम्यान, राखीव व्याघ्र क्षेत्राच्या विषयावरही केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे चर्चा केली जाईल. हायकोर्टाने राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्याच्या दिलेल्या आदेशास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.

टॅग्स :goaगोवा