शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
2
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
4
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
5
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
6
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
7
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
8
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
9
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
10
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
11
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
12
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
13
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
14
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
15
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
16
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
17
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
18
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
19
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
20
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा

मनोहर भाई: दूरदर्शी नेता, लोकप्रिय राजकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 08:26 IST

मनोहर पर्रीकर यांना त्यांच्या प्रामाणिक आणि आदर्श कार्यशक्तीमुळे, कार्यप्रणालीमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठा आदर प्राप्त झाला होता.

अजिंक्य सालेलकर, कुडचडे

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर हे भारताच्या विलक्षण राजकारणी व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, ज्यांनी गोव्याचा मुख्यमंत्री आणि भारताचा संरक्षण मंत्री म्हणून सेवा केली. साधेपणासाठी, प्रामाणिकपणासाठी आणि समर्पणासाठी परिचित असलेल्या पर्रीकरांनी भारतीय राजकारण आणि शासनावर आपल्या कार्याने अवीट ठसा ठेवला.

मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापशात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९७८ मध्ये त्यांनी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) धातुशास्त्र अभियांत्रिकीत पदवी मिळवली. संपूर्ण भारतात मुख्यमंत्री बनलेले पर्रीकर पहिले आयआयटीयन होते. जडणघडणीच्या काळात त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) प्रभाव होता. शालेय वयातच ते संघाचे सदस्य झाले होते. RSSची मूल्ये आणि शिस्तीच्या मुशीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आकार घेतला.

पर्रीकर यांनी १९९० च्या दशकात गोव्याच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीचा सदस्य या नात्याने राजकीय प्रवासाला प्रारंभ केला. कुशल नेतृत्वाने त्यांनी गोव्याच्या राजकारणात अल्पावधीत प्रतिष्ठा मिळवली. पर्रीकर यांनी (२०००-२००५, २०१२-२०१५, २०१७- २०१९) चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. दूरदर्शी आणि द्रष्टे नेतृत्व अशी त्यांनी काळात स्वतःची ओळख निर्माण केली. गोव्यातील राजकीय अस्थिरतेला पर्रीकरांच्या समर्थ, व्यावहारिक नेतृत्वामुळे स्थैर्य लाभले. वयोवृद्धांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेची सुरुवात पर्रीकरांनी. पूल, महामार्ग, राजधानीत व इतरत्रही मोठे प्रकल्प उभारले. प्रशासनाचे कार्य नागरिक केंद्रित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सुधारणा केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये पर्रीकर यांची भारताच्या संरक्षण मंत्रिपदी नियुक्ती केली. संरक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव नसताना, पर्रीकर यांनी परिवर्तनकारी नेता म्हणून आपली क्षमता सिद्ध केली. सैनिक दलांचे आधुनिकीकरण केले. आपल्या देशात संरक्षण साहित्य उत्पादन करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. भारतात शस्त्रास्त्र, विमान आणि तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन दिले. पर्रीकर यांनी २०१६च्या सर्जिकल स्ट्राईकची योजना व अंमलबजावणी केली. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारताच्या संरक्षण धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले. निवृत्त सैनिकांसाठी समान पेन्शन सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन OROP योजनेची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. संरक्षण साहित्याची व संरक्षणासाठी गरजेच्या उपकरणांची जलद खरेदी सुनिश्चित केली.

मनोहर पर्रीकर त्यांच्या साध्या जीवनशैलीसाठी आणि सामान्य स्वभावासाठी परिचित होते. ते सहसा इकोनॉमिकल क्लासमधून विमान प्रवास करत. VIP संस्कृतीपासून नेहमी दूर राहत. सर्वसामान्य लोकांमध्ये ते नेहमीच मुक्तपणे मिसळत. त्यांच्या प्रामाणिक आणि आदर्श कार्यशक्तीमुळे, कार्यप्रणालीमुळे त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत मोठा आदर प्राप्त झाला होता. आजही ते या गोष्टींसाठी नावाजले जातात.

पॅनक्रियाटिक कॅन्सरशी लढा देतानादेखील पर्रीकर मुख्यमंत्री म्हणून काम करत राहिले. त्यांची स्थैर्य आणि सार्वजनिक सेवेसाठीची वचनबद्धता लाखोंना प्रेरणा देणारी होती. सार्वजनिक सेवेमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल आयआयटी मुंबईचा प्रतिष्ठित पदवीधर म्हणून गौरव केला गेला. त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावे आधारभूत संरचना प्रकल्प आणि संस्थांचे नामकरण करण्यात आले. मोपा विमानतळाचे स्वप्न त्यांनी आपल्या कारकिर्दीत पाहिले होते. म्हणून मोपा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात आले.

१७ मार्च २०१९ रोजी कर्करोगाशी दीर्घ लढा देत मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राष्ट्राचे मोठे नुकसान झाले. पर्रीकरांचा वारसा गोव्याच्या विकासात, निर्णायक संरक्षण निर्णयांमध्ये, त्यांच्या नेतृत्वात आणि प्रामाणिक, जनतावादी शासनाचे अंगभूत दर्शवणारा आहे. पर्रीकर नेहमीच उदयोन्मुख नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. लहान मुलांचेही ते लाडके नेते होते. साधेपणा, समर्पण आणि देशभक्तीची मूल्ये साकारत, शेवटपर्यंत कार्यप्रवण राहून त्यांनी देह ठेवला. आज पर्रीकर यांची जयंती. त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर