शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

आमदार फुटून आले, परंतु त्यांचे मतदार आले नाही; सदानंद तानावडे यांची 'लोकमत' वार्तालापात कबुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2024 10:58 AM

पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: आमदार फुटून भाजपमध्ये आले; परंतु त्यांच्यासोबत त्यांचे मतदार मात्र आले नाहीत, अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली. 'लोकमत' कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीनंतर वार्तालापात ते बोलत होते.

यावेळी तानावडे म्हणाले की, आमदार आले म्हणून त्यांच्यासोबत कार्यकर्ते किंवा त्यांचे मतदार येतात असे नव्हे. दक्षिण गोव्यात जिंकलो नाही, याचा दोष मी कोणाला देणार नाही. या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. संघटनात्मकदृष्ट्या आम्ही कमी पडलो, प्रदेशाध्यक्ष म्हणून ती माझी जबाबदारी आहे, असे मी मानतो.

लोकसभेसाठी दक्षिण गोव्यात पल्लवी धेपे यांना तिकीट देण्याचा निर्णय मुलीच चुकीचा नव्हता. या मतदारसंघात उलट प्रथमच आम्हाला दोन लाखांपेक्षा अधिक मते मिळाली ही देखील मोठी उपलब्धीच आहे. संघटनात्मकदृष्ट्वाच आम्ही कमी पडलो. ज्या काही त्रुटी आहेत त्या आगामी काळात सुधारल्या जातील, असेही तानावडे एका प्रश्नावर म्हणाले. केंद्र सरकारने महिलांसाठी ३३ टक्के राजकीय आरक्षण संमत केलेले आहे त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची अधिकाधिक महिला नेत्या तयार व्हाव्यात, यासाठी प्रयत्न आहेत. गोव्यातील दोनपैकी एक जागेवर महिला उमेदवार द्या, असा आदेश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यानंतरच पल्लवी यांचे नाव पुढे आले, असे त्यांनी सांगितले.

तानावडे यांची १८ जुलै २०२३ रोजी राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली होती. या गोष्टीला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या अनुषंगाने त्यांना राज्यसभेतील त्यांच्या कामगिरीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पोर्तुगीज पासपोर्ट तसेच ओसीआय कार्डचा विषय मी राज्यसभेत मांडला. या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला आणि हा प्रश्न सोडवूनही घेतला आहे.

प्रवाह प्राधिकरण पक्षपात करू शकत नाही

राज्यात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी आरक्षणाची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी सरकारचा तसेच पक्ष म्हणून आमचाही प्रयल चालू आहे. म्हादईचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. विरोधक म्हादई प्रश्न राजकारण करीत असल्याचे तानावडे म्हणाले. या प्रकरणात प्रवाह प्राधिकरण पक्षपात करू शकत नाही. गोव्याला न्याय मिळणार, असे ते म्हणाले.

राज्यसभेत दर २ तासांनी घेतली जाते हजेरी

तानावडे म्हणाले की, राज्यसभेत सत्ताधारी भाजप खासदारांना शिस्तीने वागावे लागते. दर दहा खासदारांमागे पक्षाचा एक व्हीप असतो. शिवाय प्रमुख व्हीपही आहे. खासदार सभागृहात उपस्थित आहे की नाही, याची नोंद दर दोन तासांनी घेतली जाते. उपस्थित नसल्यास दुसऱ्या दिवशी फोन येतो व संबंधित खासदाराला पक्षाच्या विधिमंडळ नेत्याकडे स्पष्टीकरण द्यावे लागते. असे तानावडेंनी सांगितले.

राज्यसभेत असते आश्वासन समिती

राज्यसभेत दिलेली सर्वच आश्वासने पूर्ण होतात काय? पूर्ण न झालेल्या आरवासनांचे काय, असा प्रश्न केला असता तानावडे म्हणाले की, आश्वासन समिती आहे. दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास विचारणा करता येते.

चार राज्यांमध्ये निवडणुका झाल्यानंतरच संघटनात्मक बदल

तानावडे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद व राज्यसभा खासदार अशी दोन्ही पदे आहेत. लवकर संघटनात्मक निवडणुका होणार आहेत का, असा प्रश्न केला असता ते म्हणाले, सर्व प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ जानेवारी २०२४ मध्ये संपलेला आहे. आता चार राज्यांमध्ये निवडणुका झाल्यानंतरच संघटनात्मक निवडणुका होतील. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी दिं. ११ रोजी गोव्यात येणार असून, १२ रोजी भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. यावेळी बैठक व्यापक स्वरुपाची असणार आहे. ६०० ते ७०० जणांच्या या बैठकीला मंडल अध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली.

खाणी सुरू होण्यासाठी आग्रही

लोकसभा निवडणुकीसाठी खाण भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले, त्याबाबत विचारले असता तानावडे म्हणाले की, खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नये केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेट्टी यांची याच अनुषंगाने अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. खाणी सुरू व्हायला हव्यात. मंत्रिमंडळ फेररचनेवर तानावडे म्हणाले की, याबाबत कोणतीच बोलणी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आमदार, मंत्र्यांची घेतलेली बैठक येत्या विधानसभा अधिवेशनाच्या अनुषंगाने होती.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण