शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

संजीवनी साखर कारखान्याला ‘ग्रहण’, 3 दिवस कारखाना बंद असल्यानं ऊस उत्पादकांचं नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 1:09 PM

गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्यात तांत्रिक बिघाडाचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. या कारखान्याला जणू ‘ग्रहण’च लागले आहे.

पणजी : गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्यात तांत्रिक बिघाडाचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. या कारखान्याला जणू ‘ग्रहण’च लागले आहे. कंडेन्सर पंप निकामी झाल्याने तीन दिवस कारखाना बंद ठेवावा लागल्याने ऊस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कंडेन्सर पंप दुरुस्त करण्यास स्थानिक अभियंत्यांना अपयश आल्याने अखेर पुणे येथील वसंतदादा साखर कारखान्यातून तज्ञांना पाचारण करावे लागले. 

नोव्हेंबरमध्ये 20 दिवस कारखाना बंद होता त्यानंतर सलग दुस-यांना हा कारखाना बंद ठेवावा लागला. ऊस कापून कारखान्यासाठी पाठवला होता परंतु तो पडून राहिल्याने शेतक-यांचे नुकसान झाले. उन्हात ऊस कोरडा झाल्याने वजन घटले आणि त्यामुळे उत्पादकांना योग्य भाव मिळाला नाही. भर मोसमात कारखाना बंद ठेवावा लागला. ऊस भरलेले अनेक ट्रक आपला नंबर कधी लागतो याच्या प्रतीक्षेत असल्याचे ऊस उत्पादक राजेंद्र देसाई यांनी सांगितले. 

कारखान्याचे प्रशासक दामोदर मोरजकर यानी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून आलेले तज्ञ काही दिवस येथेच राहतील आणि कारखान्याच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवून असतील. यंदा मुळातच गळीत हंगाम उशिरा सुरु झाला. 71 दिवस गाळप आतापर्यंत झाले असून सुमारे 59,790 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झालेले आहे. यात 34,766 मेट्रिक टन ऊस गोव्याचा तर 26, 046 मेट्रिक टन ऊस शेजारी राज्यातील आहे. चालू मोसमात आतापयंंत 47,820 मेट्रिक टन सागर उत्पादन झालेले आहे. या गाळपातून सुमारे 8.10  टक्के इतका उतारा मिळाला. 

दरम्यान, कारखान्यातील यंत्रसामुग्री इतकी जुनी झाली आहे की त्याच्या देखभालीवरच वर्षाकाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च येतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्यासाठी नवी यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. कोल्हापूर येथील साखरतज्ज्ञ बी. एन. पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विचार आहे. पाटील यांनी साखर क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर केनियासारख्या देशातही काम केलेले आहे. त्यांना या क्षेत्रात तब्बल 34 वर्षांचा अनुभव आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेgoaगोवा