शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

गोव्याच्या संजीवनी साखर कारखान्यात 58 हजार क्विंटल साखर विक्रीसाठी पडून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 2:49 PM

गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना अस्तित्वासाठी झुंज देत असतानाच या कारखान्यात सुमारे 58 हजार 336 क्विंटल साखर विक्रीविना पडून असल्याची माहिती हाती आली आहे.

ठळक मुद्देसंजीवनी सहकारी साखर कारखाना अस्तित्वासाठी झुंज देत असतानाच या कारखान्यात सुमारे 58 हजार 336 क्विंटल साखर विक्रीविना पडूनधारबांदोडा तालुक्यातील दयानंद नगर येथे असलेला 46 वर्षे हा जुना कारखाना सध्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. ऑक्टोबर आणि जवळपास नोव्हेंबर असे दोन महिने उलटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पणजी - गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना अस्तित्वासाठी झुंज देत असतानाच या कारखान्यात सुमारे 58 हजार 336 क्विंटल साखर विक्रीविना पडून असल्याची माहिती हाती आली आहे.

धारबांदोडा तालुक्यातील दयानंद नगर येथे असलेला 46 वर्षे हा जुना कारखाना सध्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. राजकारण्यांची सहकार क्षेत्राकडील अनास्था तसेच या साखर कारखान्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे या कारखान्यातून फारसे मोठे उत्पन्न सरकार येऊ शकले नाही. गेल्या 46 वर्षांच्या काळात नेहमीच तोटा होत राहिला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्याच्या ठिकाणी झालेले हवा आणि पाणी प्रदूषणाची गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ हा कारखाना बंद करण्याचा आदेश दिला होता या पार्श्वभूमीवर राज्यातील ऊस उत्पादकांचे मोठे संकट निर्माण झाले आहे. संजीवनी सहकारी साखर कारखान्याला ऊस गेला नाही तर पाठवायचा कुठे? असा प्रश्न उत्पादकांसमोर आहे. या शेतकऱ्यांनी ऊस लागवड केलेली आहे.

मध्यंतरी या कारखान्यातील मळीपासून वीज निर्मितीचा प्रस्ताव होता परंतु तोही बारगळला. कारखाना नफ्यात आणण्यासाठी तसेच कारखान्यात सुधारणा घडून आणण्यासाठी कोल्हापूरच्या तज्ञ मंडळींना आणले परंतु त्यांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी सरकार करू शकले नाही. या भागाचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन 5 डिसेंबरपर्यंत कारखाना सुरू करण्याबाबत सरकारने पाऊल उचलले नाही तर लोकांना घेऊन रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे. गावकर हे अपक्ष असले तरी सध्या सरकार बरोबर आहेत आणि सरकारला त्यांनी हा इशारा दिला आहे. 

गळीत हंगाम सुरू व्हायला हवा होता परंतु तो सुरू होऊ शकलेला नाही. ऑक्टोबर आणि जवळपास नोव्हेंबर असे दोन महिने उलटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी  मोठे आंदोलनही करून महामार्ग रोखण्याचा इशारा दिला. गेल्या मोसमात या कारखान्याला सुमारे 8 कोटी रुपये तोटा झाला. सरकार आणि कारखाना यांच्यातील समन्वयाअभावी साखरी विक्रीविना पडून राहिली. कारखान्यात तांत्रिकी बिघाडाचे प्रकार सर्रास घडू लागले होते. गेल्या गळीत हंगामात मध्यंतरी  कंडेन्सर पंप निकामी झाल्याने तीन दिवस कारखाना बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कंडेन्सर पंप दुरुस्त करण्यास स्थानिक अभियंत्यांना अपयश आल्याने अखेर पुणे येथील वसंतदादा साखर कारखान्यातून तज्ञांना पाचारण करावे लागले होते

गेल्या नोव्हेंबरमध्ये 20 दिवस कारखाना बंद होता ऊस कापून कारखान्यासाठी पाठवला होता परंतु तो पडून राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षी गळीत हंगामात सुमारे 59,790 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले. यात 34,766 मेट्रिक टन ऊस गोव्याचा तर 26,046 मेट्रिक टन ऊस शेजारी राज्यातील होता. कारखान्यातील यंत्रसामुग्री इतकी जुनी झाली आहे की त्याच्या देखभालीवरच वर्षाकाठी सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च येतो.

टॅग्स :goaगोवाSugar factoryसाखर कारखाने