शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

उत्तरेत श्रीपाद नाईकांच्या यशात बहुजनांचा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 20:48 IST

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयी झालेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळीही बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात मते दिली हे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देउत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयी झालेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळीही बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात मते दिली हे स्पष्ट झाले.सत्तरी तालुक्याने तर भाजपाच्या पारड्यात हजारो मते टाकली. त्याचबरोबर डिचोली तालुक्यानेही मोठी साथ दिली.श्रीपाद नाईक पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना विरोधकांनी नाईक यांना अकार्यक्षम ठरविण्याचा प्रयत्न केला.

पणजी - उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयी झालेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळीही बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात मते दिली हे स्पष्ट झाले आहे. सत्तरी तालुक्याने तर भाजपाच्या पारड्यात हजारो मते टाकली. त्याचबरोबर डिचोली तालुक्यानेही मोठी साथ दिली.

श्रीपाद नाईक पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना विरोधकांनी नाईक यांना अकार्यक्षम ठरविण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच बाबूश मोन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे तिसवाडीत भाजपाची मते कमी होतील असे अनेकांना वाटले होते पण मते कमी झाली नाहीत. बार्देश तालुक्यात थोडी कमी झाली पण पेडणे, सत्तरी, डिचोली तालुक्यांमध्ये खूपच मते श्रीपाद नाईक यांना प्राप्त झाली. पर्ये मतदारसंघात भाजपाला 10 हजार मतांची आघाडी मिळाली. तो मतदारसंघ काँग्रेसचे प्रतापसिंग राणे यांच्या ताब्यात आहे, तिथे वाळपईपेक्षाही जास्त मतांची आघाडी भाजपाला मिळाली. वाळपईतही भाजपाने प्रचंड मते मिळवली पण मुस्लिम धर्मीय मतदारांनी मते दिली नाहीत असे दिसून येते. मंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सत्तरी व उसगावमध्ये भाजपाची मते वाढली. तसेच मये, डिचोली या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे राजेश पाटणेकर, प्रविण झाटय़े, अनंत शेट यांच्या प्रयत्नांमुळे भाजपाला प्रचंड मते प्राप्त झाली.

बार्देश व तिसवाडीच्या ख्रिस्ती धर्मीय मतदारांनी जास्त मते भाजपाला दिली नाही. ती मते काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्याकडे वळली. मात्र भंडारी समाजातील मतदारांनी व विशेषत: हिंदू बहुजन समाजाने काँग्रेसपेक्षा भाजपाला उत्तरेत जास्त पसंती दिली. त्यामुळेच प्रियोळ व थिवी या दोन मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वी श्रीपाद नाईक यांची आघाडी 55 हजारांच्या पुढे पोहचली होती. मतमोजणी पूर्ण होण्यास रात्री बराच उशीर झाला. काँग्रेसचे उमेदवार चोडणकर हेही भंडारी समाजातील आहेत पण ते जास्त मते फोडू शकले नाहीत. आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा उत्तरेत प्रभाव पडला नाही. शिवसेना व सुरक्षा मंचने उमेदवार उभे केले नव्हते. 2014 सालच्या निवडणुकीत भाजपाला उत्तरेत 1 लाखापेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली होती. यावेळी ती कमी झाली.

 

टॅग्स :Goa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस