शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

आधी वारकऱ्यांच्या समस्या सोडवा, मगच निवास बांधा; आमदार विजय सरदेसाई यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2024 08:28 IST

अधिवेशनाच्या शून्य तासाच्या कामकाज दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सुमारे २१ मंडळे ४५० किलोमिटर पेक्षा जास्त अंतर पायी चालत पंढरपूर वारी करत असतात. वारी दरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या वारकऱ्यांना सरकारने समाजकल्याण खात्यातर्फे थोडेफार अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. केवळ पंढरपूर येथे पोहचून भक्त निवास बांधणार, हे जाहीर केले म्हणजे वारकऱ्यांच्या समस्या सोडवल्या असे होत नाही, अशी टोला देखील सरदेसाई यांनी लगावला.

अधिवेशनाच्या शून्य तासाच्या कामकाज दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय मांडला. वारकऱ्यांना वारी दरम्यान कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याची कल्पना देखील दिली. वारकरी मोठ्या श्रध्देने पायी चालत पंढरपूरला जातात. त्यांना प्रवासात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खासकरून बेळगाव ते कोल्हापूर या दरम्यान त्यांना वाटेत नीट सुविधा मिळत नाही. येथे शौचालये नाही किंवा आंघोळ करण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी योग्य सुविधा नाहीत. त्यामुळे सरकारने यात लक्ष्य घालून वारकऱ्यांना तशा प्रकारच्या सुविधा दिल्या जाऊ शकतात का, हे पाहावे. या सुविधा मिळाल्या नाहीत तर वारकरी आजारी पडण्याच्या भीती असते, असे सरदेसाई यांनी सांगितले.

सरकारने वारकऱ्यांना सुरक्षित घरी आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी. हज यात्रेसाठी समाज कल्याण खात्यातर्फे अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर वारकऱ्यांना देखील अनुदान देण्याची गरज आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. यावर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक गोष्टी करू, असे सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन