शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अपात्रता याचिकेसाठी सभापतींवर वेळेचे बंधन हवेच!; लोकायुक्तांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:51 IST

'लोकमत' कार्यालयास भेट.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आमदार अपात्रता याचिकेवर निकाल देण्यासाठी सभापतींवर वेळेचे बंधन असायला हवे, असे मत लोकायुक्त तथा हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी व्यक्त केले. 'लोकमत'ला बुधवारी दिलेल्या सौजन्य भेटीवेळी वार्तालापात ते बोलत होते. 

महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या तसेच अजित पवार गटाच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर ठरावीक कालावधीत निवाडा देण्याचे आदेश दिले आहेत. गोव्यातही सभापती रमेश तवडकर यांच्याकडे आठ काँग्रेसच्या फुटीर आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका आहेत. 

न्यायालयाने सभापतींना अपात्रता याचिकांवर निवाडा देण्यासाठी वेळेचे बंधन घालणे योग्य आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, यावर माझे म्हणणे 'हो' असेच आहे. वेळेचे बंधन असायला हवे. लोकप्रभावाखाली न्यायदान करणे चुकीचे नव्हे. जनमताची कदर व्हायला हवी, न्यायालय न्याय देते असे म्हणण्यापेक्षा अन्याय निवारणाचे काम करते, असे म्हणणे उचित ठरेल, असेही ते म्हणाले. लोकायुक्त म्हणाले की, 'न्यायाधीशाने वकिलांना खरे तर प्रश्न करून खटल्यातील न उलडगणारे पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करावा.

सरकारी निर्णयांविरुद्ध अपिलांची संख्या वाढत आहे. त्याबद्दल विचारले असता लोकायुक्त म्हणाले की, वरिष्ठ सरकारी अधिकारी जेव्हा काही निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या विद्वत्तेला किंवा शहाणपणाला आव्हान देता येणार नाही. त्या-त्या परिस्थितीला अनुसरून काळानुरूप निर्णय घेतले जात असतात. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आव्हान देऊन कसे चालेल?, असेही जोशी म्हणाले.

आय एम विथ यू...

जो न्यायाधीश बोलत नसतो तो घातक असतो. मी वकील असताना कोर्टात अशिलाची बाजू मांडत असताना न्यायाधीशाने मला 'आय एम विथ यू, असे सांगत युक्तिवाद थांबवण्यास सांगितले त्यानुसार मी युक्तिवाद थांबवला. परंतु नंतर विरुद्ध पक्षाच्या बाजूने निकाल दिला. न्यायाधीश जेव्हा काहीच बोलत नाही तेव्हा न्यायालयात आपण केलेला युक्तिवाद किंवा मुद्दे न्यायाधीशाला पटले आहेत किंवा नाहीत, हे वकिलाच्या लक्षात येत नाही.'

 

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमत