शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

एसटी समाज आरक्षणासाठी केंद्राला साकडे: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 4:21 PM

प्रश्न चार मतदारसंघांचा : सर्वपक्षीय शिष्टमंडळ शाहांना भेटणार

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गावडा, कुणबी, वेळीप आदी अनुसूचित जमातींना विधानसभेत राजकीय आरक्षण (राखीवता) मिळावी या मागणीसाठी लवकरच आमदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय कायदामंत्राच्या भेटीसाठी दिल्लीला नेले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत राखीवता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एसटी समाजाला विधानसभेत राखीव जागा मिळायला हव्यात, अशी मागणी करणारा आमदार गणेश गावकर यांचा खाजगी ठराव सभागृहात एकमताने संमत करण्यात आला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई व इतर पाचही विरोधी आमदारांनी या ठरावाला पाठिंबा दिला त्यामुळे तो एकमताने संमत झाला.

त्याआधी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी राखीवता न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा एसटी समाजाने जो इशारा दिलेला आहे, त्याकडे सरकारचे लक्ष वेधले. सरकारने ही गोष्ट गंभीरपणे घ्यावी व एसटी समाजाच्या लोकांना न्याय द्यावा. केंद्रातही भाजप सरकार असल्याने शिष्टमंडळ दिल्लीला नेल्यास हा प्रश्न सहजपणे सुटू शकेल असे ते म्हणाले.

विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी या ठरावाला पाठिंबा देताना अशी सूचना केली की, केवळ ठराव घेऊन भागणार नाही तर केंद्रात भाजप सरकार असल्याने राज्य सरकारने तेथे पाठपुरावा करावा.' काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनीही समर्थन दिले. ते म्हणाले की, 'एसटी समाज हा मूळ गोवेकर आहे आणि अजूनही उपेक्षित राहिलेला आहे. त्यांना न्याय मिळायला हवा.'

आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएश व क्रुझ सिल्वा यांनीही विधानसभेत एसटींना राखीवता मिळायला हवी, अशी मागणी केली. कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वास म्हणाले की, एसटी दर्जा मिळून वीस वर्षे उलटले तरी अजून विधानसभेत राखीवता नाही, हे योग्य नव्हे. केंद्र सरकारला अनेक निवेदने दिलेली आहेत. राज्य सरकारने या गोष्टीचा आता पाठपुरावा करावा.'

रिव्होल्यूशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर यांनी अद्याप अनुसूचित जमातींचे वास्तव्य असलेले विभाग अधिसूचित झालेले नाहीत, याकडे लक्ष वेधले. त्यावर तो स्वतंत्र विषय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ठराव मांडताना आमदार गणेश गावकर म्हणाले की, 'गोव्यातील हा समाज अजून मुख्य प्रवाहात आलेला नाही. १०.२३ टक्के लोकसंख्येप्रमाणे विधानसभेत जागा राखीव मिळायला हव्यात. सरकारने पुनर्रचना आयोग नेमण्यासाठी २४ मे रोजी केंद्राला पत्र पाठवले आहे, त्याचा पाठपुरावा करावा. '

केंद्राला पत्र लिहिले

मुख्यमंत्री म्हणाले की, राखीवतेआधी पुनर्रचना आयोग स्थापन करावा लागेल. त्यासाठी केंद्राला पत्र लिहिले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात एसटी समाजाची लोकसंख्या १ लाख ४९१ हजार एवढी आहे. हे प्रमाण २७५ ६०.२३ टक्के आहे. चार राखीव द्याव्या लागतील. २४ मे रोजी केंद्राला पत्र लिहून पुनर्रचना आयोग स्थापनेची विनंती केली आहे. विरोधकांनी लोकांना भडकावू नये' असे ते म्हणाले.

२००३ साली इतर राज्यांमध्ये ज्या समाजांना एसटीचा दर्जा मिळाला त्यांना तेथे राजकीय राखीवता मिळालेली आहे. जम्मू- काश्मीरमध्ये अलीकडेच पुनर्रचना आयोग नेमून तेथेही एसटीना राजकीय राखीवता देण्याचे सोपस्कार चालू आहेत. राज्य सरकारने ताबडतोब केंद्रीय गृहमंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेऊन हा प्रश्न धसास लावावा. -रमेश तवडकर, सभापती

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाmonsoonमोसमी पाऊस