शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

राज्यात संततधार; आजही मुसळधार शक्य

By admin | Published: September 24, 2016 2:44 AM

पणजी : संततधार पावसाने गोव्यालाही झोडपून काढले असून ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत.

पणजी : संततधार पावसाने गोव्यालाही झोडपून काढले असून ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत. क्षणाचीही उसंत न घेता कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्या शनिवारीही काही भागांत मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईहून येणाऱ्या बसगाड्याही सकाळी गोव्यात पोहोचू शकल्या नाहीत. येथील वेधशाळेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ एच. हरिदासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अजून आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गोव्यासह कोकण आणि महाराष्ट्रात संततधार आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचेच आहेत. राजधानी पणजीत शुक्रवारी सकाळी ८.३0 ते सायंकाळी ५.३0 या कालावधीत २३ मि.मी. पावसाची नोंद झाली. पणजीत दिवसभर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारक मेटाकुटीला आले. रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकल्या. राज्यात काही अपघातही घडले. दोन दिवसांपूर्वीच अंजुणे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)