शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

म्हादईबाबत जनजागृतीसाठी आयोजित पदयात्रा रोखणे ही लोकशाहीची हत्या; आरजीची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 3:46 PM

पदयात्रा अडविणाऱ्या स्थानिक पंच, सरपंचांवर त्यांनी टीका केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: म्हादईबाबत जनजागृतीसाठी आयोजित पदयात्रा रोखणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशी प्रतिक्रिया रिव्होल्युशनरी गोवन्सचे नेते मनोज परब यांनी दिली आहे. पदयात्रा अडविणाऱ्या स्थानिक पंच, सरपंचांवर त्यांनी टीका केली. 

मनोज परब म्हणाले की, 'आमदार दिव्या राणे यांनी तसेच स्थानिक पंचायत मंडळांनी सत्तरीमध्ये म्हादईबाबत जनजागृती करण्यासाठी बाहेरच्यांची गरज नसल्याचे वक्तव्य केले. हे वक्तव्य निषेधार्ह आहे. सत्तरीमध्ये येण्यास कोणीच कुणाला अडवू शकत नाही. कोणीही अन्यायाविरुद्ध आवाज काढू शकतो. जे आज सत्तरीच्या विकासाची भाषा करतात, त्यांनी आमच्याबरोबर येऊन सत्तरी बघावी. आम्ही त्यांना खरा विकास दाखवून देऊ. कुठे कसा विकास झाला आहे, ते आम्ही दाखवून देऊ.' 

परब म्हणाले की, 'आज खरेतर सत्तेत असलेल्या राजकारण्यांनी म्हादईबाबत जनजागृती करण्यासाठी पदयात्रा, जनसभा आयोजित करायला पाहिजे होत्या. तसे न करता जे यासाठी आवाज उठवत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तरीमध्ये आमचे दहा हजार मतदार आहेत. त्यांच्यासह इतरांना जागे करण्यासाठी ही जनजागृती आहे. म्हादई नदी वाचली पाहिजे ही भावना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी म्हादईचा जास्तीत जास्त परिणाम होणाऱ्या गावांतील लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. मात्र, आम्हाला कोणीच अडवू शकत नाही.

दरम्यान, आरजीचे वकील धवल झावेरी यांच्याशी संपर्क साधला असता पदयात्रा ज्या कारणास्तव रोखली आहे, ते आक्षेप चुकीचे आहेत, असे सांगितले. आरजी पक्षाच्यावतीने सत्तरी तालुक्यातील ठाणे ते उसगाव अशी सुमारे १०० किलोमीटरची ही पदयात्रा काढण्यात येणार होती. सोमवारी पदयात्रेस सुरुवात झाल्यावर म्हाऊस-सत्तरी पंचायतीने त्यास आक्षेप घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा