शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

अकार्यक्षम अभियंत्यांवर प्रहार; मुख्यमंत्री आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2024 10:28 AM

२७ कंत्राटदार काळ्या यादीत; ३० अधिकाऱ्यांना नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांबाबत सरकारने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. एकूण २७ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून बांधकाम खात्याच्या ३० अभियंत्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. दोषी आढळणाऱ्या अभियंत्यांना दंड ठोठावला जाणार आहे. तर कंत्राटदारांना, ३० नोव्हेंबरपर्यंत स्वतःच्या खर्चाने रस्ते दुरुस्ती करुन हॉटमिक्स करुन द्यावे लागतील.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल, शुक्रवारी रस्ते पायाभूत सुविधांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम, वीज खाते तसेच जलस्रोत खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच वित्त सचिव बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सरकारने खराब रस्त्यांबाबत अवलंबिलेल्या कठोर धोरणाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, '२७ कंत्राटदारांबाबत कडक भूमिका घेतलेली आहे. त्यांना काळ्या यादीत टाकल्यातच जमा असून रस्ते नव्याने बांधून दिल्याशिवाय त्यांना नवे कंत्राट मिळणार नाही. एकदा रस्ता बांधल्यानंतर संबंधित कंत्राटदार दोष उत्तरादायित्त्व कालावधीत रस्त्यांची देखरेख आणि देखभाल करण्यासाठी पूर्णपणे जबाबदार राहील. अभियंतेही जबाबदार असतील.'

सावंत म्हणाले की, 'खराब रस्त्यांना कंत्राटदार जबाबदार आहेत. निकृष्ट रस्ते पूर्वपदावर आणून हॉटमिक्स करुन ३० नोव्हेंबरपर्यंत कंत्राटदारांनी काम पूर्ण करावे लागेल. अन्यथा कंत्राटदारांचे परवाने निलंबित केले जातील. त्यांना कोणत्याही निविदा भरण्यास मनाई केली जाईल.

रस्त्यांचे जीआयएस मॅपिंग

सावंत म्हणाले की, 'राज्यातील प्रत्येक रस्त्याचे जीआयएस आधारित प्रणालीव्दारे मॅपिंग केले जाईल. एकदा रस्ता बांधून पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षे खोदकाम करण्यास प्रतिबंध असेल. रस्ते खोदल्यास मोठा दंड आकारला जाईल. वैयक्तिक कामांसाठीही रस्ता खोदण्यासाठी परवानगी मागितल्यास एक हजार पटीने शुल्क वाढवले जाईल. जे या नियमांचे उल्लंघन करतात त्यांना दंड ठोठावला जाईल. भूमिगत वीज केबल टाकणे, पाण्याच्या पाइपलाइन, मलनिस्सारण वाहिन्यांचे आदी कोणतेही पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाईल. सर्व संबंधित विभागांचा समन्वय राहील याकडे लक्ष दिले जाईल.

अधिकाऱ्यांना दंड ठोठावणार 

मुख्यमंत्री म्हणाले की, रस्त्याचा दर्जा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरलेल्या अभियंत्यांवरही कारवाई केली जाईल. निष्काळजीपणाबद्दल जबाबदार धरुन अभियंत्यांना दंड ठोठावला जाईल. रिपोर्ट सादर करण्यास अपयशी ठरलेल्या अभियंत्यांना दुहेरी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जातील.'

एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांच्या बदल्या

बांधकाम खात्यातील जे रस्ते विभागात कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंते पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकाच जागी काम करत आहेत, त्या सर्वांच्या बदल्या केल्या जातील. दरम्यान, राज्यात १,२०० कि.मी. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. हे रस्ते वीज केबल, जलवाहिन्या किंवा अन्य पाइलपलाइन्स टाकण्यासाठी खोदले होते व खराब झालेले आहेत.

२० वर्षांत बांधकाममंत्र्यांनी खात्याला न्याय दिला नाही

गेल्या १५ ते २० वर्षात झालेल्या बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी या खात्याला न्याय दिला नाही, त्यामुळेच रस्त्यांची स्थिती बिकट झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ३० ते ३५ वर्षे काम करणाऱ्या अभियंत्यांना रस्त्यांबद्दल माहिती हवी. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. पुढील २५ वर्षे रस्ता खराब होता कामा नयेत याची काळजी मी घेईन' असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत