शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सेंद्रिय अन् प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीवरील निर्बंध उठविणार : सुरेश प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 22:31 IST

'असोचेम'ने गोव्यात आयोजित केलेल्या 'मध्यम व लघु उद्योगांना अन्नप्रक्रिया व्यवस्थेत मजबूत करणे' या विषयावरील परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

पणजी : सेंद्रिय अन्न तसेच प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीवर असलेले निर्बंध उठविले जातील, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी कृषी निर्यात धोरण मंजूर केल्यानंतर सुरेश प्रभू यांनी केलेली ही महत्त्वाची घोषणा आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून शीतगृहांची साखळी निर्माण केली जाईल. त्यासाठी विविध राज्य सरकारांची ही मदत घेतली जाईल. या कामासाठी विशेष अधिकारी नेमले जातील, असे प्रभू यांनी स्पष्ट केले.

'असोचेम'ने गोव्यात आयोजित केलेल्या 'मध्यम व लघु उद्योगांना अन्नप्रक्रिया व्यवस्थेत मजबूत करणे' या विषयावरील परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. प्रभू म्हणाले की, 'सेंद्रिय अन्न तसेच प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यातीवरील निर्बंध उठवले जातीलच, शिवाय अन्य कृषी उत्पादनांबाबत ही परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल.

कृषी, फलोत्पादन, मांस, डेअरी पदार्थांसाठी बाजारपेठ उपलब्ध केली जाईल. 14 हजार कोटींची योजना असून इतर काही योजनाही एकत्र करून लाभ दिला जाईल. प्रभू म्हणाले की, ' भारतात उत्पादित होणारी 30 टक्के फळे वाया जातात. फळे आणि भाजी उत्पादनात भारत देश जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अन्नप्रक्रिया उद्योग अधिकाधिक यावेत यासाठी सरकारचा प्रयत्न आहे अबुधाबी इन्वेस्टमेंट ऑथॉरिटीने या कामात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.

सागरी मत्स्य संपत्ती बाबत प्रभू म्हणाले की, ' गोव्यासह 13 किनारी राज्यांची मदत घेऊन सध्या 30 अब्ज डॉलरवरून मासे निर्यात 60 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. जपान आणि कोरिया यासारख्या राष्ट्रांकडे या क्षेत्रात गुंतवणूक अपेक्षित आहे. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूgoaगोवा