शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वीज खंडित झाल्यास सरकारला आता ग्राहकांना द्यावी लागेल भरपाई

By किशोर कुबल | Updated: June 25, 2024 15:11 IST

नुकसान भरपाईची रक्कम ४० रुपये ते १००० रुपये प्रति दिवस किंवा विलंबाच्या तासापर्यंत असेल. 

किशोर कुबल/ पणजी : संयुक्त विद्युत नियामक आयोगाच्या (जेईआरसी) नियमांनुसार आता वीज खंडित झाल्यास किंवा  वीज वितरणातील विशिष्ट कामगिरी मानकांची पूर्तता न केल्यास वीजबिले समायोजित करून ९० दिवसांच्या आत ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल. नुकसान भरपाईची रक्कम ४० रुपये ते १००० रुपये प्रति दिवस किंवा विलंबाच्या तासापर्यंत असेल. 

वीज पुरवठ्यातील बिघाड, बिलिंगमध्ये विलंब, बिलिंग तक्रारींचे निराकरण, मीटरच्या समस्या सोडवणे, बिघाड झाल्यानंतर वीज पुनर्संचयित करणे, विजेच्या दाबाचा चढउतार व्यवस्थापित करणे आणि वितरण नेटवर्क समस्यांचे निराकरण करणे यासाठी ग्राहक भरपाईचा दावा करू शकतात. 

आयोगाने १२ जून रोजी गोवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश (वितरण परवानाधारकांसाठी कार्यप्रदर्शन मानक) (प्रथम दुरुस्ती) विनियम अधिसूचित केले आहे.  

 सरकारने नुकसान भरपाई न दिल्यास ग्राहकांना ग्राहक तक्रार निवारण मंच कडे जाण्याचा पर्याय आहे. गोवा सरकारला सहा महिन्यांच्या आत ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी आणि नुकसान भरपाई मागण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म स्थापन करावा लागेल. सरकारला ग्राहक संबंध व्यवस्थापन प्रणाली देखील लागू करावी लागेल. 

नवीन वीज जोडणीकरिता मेट्रो शहरांसाठी तीन दिवस, शहरी भागांसाठी सात दिवस, ग्रामीण भागासाठी १५ दिवस आणि नवीन सुधारणांनुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर ग्रामीण बेटांसाठी ३० दिवसांची मुदत आयोगाने अधिसूचनेत निश्चित केली  आहे. वीज पुरवठ्यातील बिघाडांसाठी पुनर्संचयित करण्याची वेळ चार तासांपासून अठ्ठेचाळीस तासांपर्यंत आहे. 

टॅग्स :goaगोवा