शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

नवीन कायदा देश सोडून पळालेल्या गुन्हेगारांना अद्दल घडवली; पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई

By वासुदेव.पागी | Updated: May 22, 2024 16:59 IST

भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ  आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पणजीः गुन्हेगारी संबंधी जुनी कायदा संहिता रद्द करून नवीन संहिता लागू केल्यामुळे  देशात गुन्हे करून पळून जाणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करणे सुलभ होईल असा विश्वास गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी व्यक्त केला आहे.  

भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ  आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बिश्नोई बोलत होते. ते म्हणाले की  गुन्हेगारीचा जुना कायदा  मोडीत काढून नवीन कायदा लागू केल्याने अनेक महत्तवाकांक्षी बदल अपेक्षित आहेत.  गुन्हे प्रकरणे धसास लागण्याचे प्रमाणही वाढेल आणि गुन्हेगारी सिद्ध होण्याचेही प्रमाण वाढेल.  कारण गुन्हेगारी सिद्ध होण्यासाठी येणाऱ्या अनेक तांत्रिक अडथळ्यांचा विचारही नवीन कायद्यात करण्यात आला आहे. सुधारीत कायदा हा तपास कामाला अधिक गती देणारा आणि तपास कामात पारदर्शकता आणणारा आहे असे त्यांनी सांगितले. 

विशेष करून इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना देण्यात आलेली मान्यता हे नवीन कायद्याचे वैशिष्ठ्य आहे. तपास कामेही त्यामुळे लांबणीवर पडणार नाहीत. नागरिक ऑनलाईन पद्धतीनेही तक्रार नोंदवू शकतो आणि त्या तक्रारीवर तीन दिवसात कारवाई करणे पोलीसांना सक्तीचे असणार आहे.  देशात गुन्हे करून पळून जाणाऱ्यांचे त्रांकडे मडणारी हा नवीन कायदा आहे. कारण अशा लोकांविरुद्ध कारवाई कऱण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडथळे निकालात काढण्यात आले आहेत. तसेच संबंधित संशयितांनी ताब्यात देण्या संबंधीचा करार अनेक देशांशी करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. उत्तर गोव्याचे अधिक्षक आयपीएस अधिकारी अक्षत कौशल आणि दक्षिण गोव्याचे अधीक्षक आयपीएस अधिकारी राहुल गुप्ता यांनी अनुक्रमे  भारतीय नाय्य संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता  यांची माहिती पत्रकारांना यावेळी दिली.